महाराष्ट्र

तारापूर अणुशक्ती केंद्रातून रायफल आणि जिवंत काडतुसांसह सुरक्षा जवान बेपत्ता

पालघर जिल्ह्यातील तारापूर येथे भारतातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प आहे.

वृत्तसंस्था

अति संवेदनशील असलेल्या पालघर तालुक्यातील तारापूर येथील भाभा अणुऊर्जा प्रकल्पात बंदोबस्तासाठी तैनात असलेला सीआयएसएफचा जवान त्याच्यासोबत बंदूक आणि ३० जिवंत काडतुसासह बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. तो कुठे गेला, त्याने ही काडतुसे का घेतली, तो कोणाला भेटला आणि तो सध्या कुठे आहे. या प्रश्नांनी सर्व सुरक्षा यंत्रणा चक्रावली असून या जवानांचा युद्धपातळीवर तपास सुरू आहे. त्यामुळे या राष्ट्रीय प्रकल्पाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पालघर जिल्ह्यातील तारापूर येथे भारतातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प आहे. हा प्रकल्प अति संवेदनशील असल्याने या ठिकाणी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवला जातो. या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेत असलेला केंद्रीय औद्योगिक दलाचा जवान स्वतःजवळ असलेली रायफल आणि ३० जिवंत काडतुसांसह काल दुपारी २ वाजेच्या सुमारास अचानक गायब झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

मनोज यादव असे या गायब झालेल्या जवानाचे नाव असून तो सन २०१०पासून सेवेत असून दोन महिन्यांपासून तो तारापूर येथील अणुशक्ती केंद्रात रुजू झाला होता. मूळचा अहमदाबाद गुजरातचा राहणारा असल्याचे समजते. तारापूर येथे असलेल्या सीआयएसएफ कॉलनीमध्ये राहणारा हा जवान काही तासानंतर पुन्हा रुजू होईल याच्या प्रतीक्षेत सीआयएसएफचे स्थानिक अधिकारी व कर्मचारी होते.

ओला दुष्काळ जाहीर करण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नकार; पण सर्व सवलती लागू, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! क्वेट्टामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, १० ठार, भयानक व्हिडिओ समोर

Dombivali : झोपेतच सर्पदंश! ३ वर्षांच्या चिमुकलीसह मावशीचा मृत्यू; KDMC रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत