उष्णतेने महाराष्ट्र होरपळला; राज्यात मार्चपासून उष्माघाताचे २२६ रुग्ण 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

उष्णतेने महाराष्ट्र होरपळला; राज्यात मार्चपासून उष्माघाताचे २२६ रुग्ण

महाराष्ट्रात सध्या उन्हाची तीव्र लाट पसरली असून उष्माघाताच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

अमित श्रीवास्तव

अमित श्रीवास्तव/मुंबई

महाराष्ट्रात सध्या उन्हाची तीव्र लाट पसरली असून उष्माघाताच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मार्च ते २० मे या अडीच महिन्यांच्या कालावधीत राज्यातील उष्माघाताच्या रुग्णांची एकूण संख्या २२६ वर पोहोचली आहे. विशेषतः मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात केवळ चार दिवसांत तब्बल १७१ जणांना उष्माघाताचा फटका बसल्याने राज्यातील परिस्थिती गंभीर बनली आहे. उन्हाच्या या तीव्र लाटेमुळे राज्यात ६ संशयित मृत्यूंची नोंद झाली असून अंतिम अहवालानंतर यावर शिक्कामोर्तब होईल.

लाटेचा सर्वाधिक फटका संभाजीनगरला बसला असून तेथे सर्वाधिक ४१ रुग्णांची नोंद झाली. नंदुरबारमध्ये २४, नाशिकमध्ये १९, बुलढाण्यात १७, अमरावतीत १६ तर वर्ध्यात १४ रुग्ण आढळले. मुंबईत तापमान वाढत असले तरी उष्माघाताचा एकही रुग्ण आढळलेला नाही.

Mumbai : धारावीतील झोपडीधारकांची पात्रता लवकरच निश्चित होणार; धारावी पुनर्विकास प्रकल्पाला वेग, लवकरच मास्टर प्लॅनला मंजुरी

माऊंट एव्हरेस्टवर गिर्यारोहकांचा ट्रॅफिक जाम; गिर्यारोहकांच्या संख्येवर मर्यादा आणा, विक्रमवीर रिता शेर्पा यांची मागणी

निसर्गरम्य, पर्यटनप्रेमी माथेरान झालं १७६ वर्षांचं; सह्याद्रीच्या कुशीतील चिमुकले गाव पर्यटकांचे बनले आवडते

कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही; रिक्षा-टॅक्सीचालकांना १५ ऑगस्टपर्यंत व्यावहारिक मराठी शिकणे सक्तीचेच

UPSC 2027 : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे कॅलेंडर जाहीर