महाराष्ट्र

मध्यावधी निवडणुकाबाबतीत शरद पवारांनी व्यक्त केले 'हे' मत

16 आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश

प्रतिनिधी

राज्यात केव्हाही मध्यावधी निवडणुका होतील, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारचे भवितव्य अवलंबून आहे. या निकालानंतर शिंदे-फडणवीस सरकार टिकणार की नाही, हे स्पष्ट होईल. 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहे.

हे सरकार कोसळेल, अशी विधाने शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून वारंवार होत आहेत. त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वेगळे मत व्यक्त केले आहे. पत्रकार परिषदे दरम्यान पवारांना शिंदे-फडणवीस सरकारच्या अस्थिरतेबाबत विचारले असता ते म्हणाले, सरकार पडेल की नाही हे सांगणारा मी ज्योतिषी नाही. माझा विश्वास नाही. मी कुठेही हात दाखवायला जात नाही. महाराष्ट्रात असे कधीच घडले नव्हते. ठाकरे गटनेत्यांच्या वक्तव्यावर भाष्य करताना ते म्हणाले की, मध्यावधी निवडणुका होतील की नाही हे सांगण्याच्या मनस्थितीत मी नाही.

आपटा हरवतोय…दसऱ्याचे सोने की नकली पाने? बाजारात कांचनच्या पानांचा सुळसुळाट

राज्यात आता २४ तास शॉपिंग उत्सव; मॉल्स, दुकानांसह सर्व आस्थापने उघडी ठेवण्यास सरकारची परवानगी

‘लाडक्या बहिणीं’साठी वडील, पतीचे ‘आधार’ सक्तीचे; राज्य सरकारचा निर्णय

ठाणे पालिकेचे उपायुक्त ACB च्या जाळ्यात; २५ लाखांच्या लाचप्रकरणी अटकेत

Mumbai : गरब्यात अंडी फेकल्याने गोंधळ; मीरारोडमधील घटना, काशीगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल