महाराष्ट्र

चार भिंतीत बसल्यावर लोकांच्या भावना कशा कळणार? उद्धव ठाकरेंवर टीका करताना काय म्हणाले श्रीकांत शिंदे?

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेमध्ये उपस्थितीत राहत, सत्ताधारी पक्षावर टीका केली.

प्रतिनिधी

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेमध्ये उपस्थितीत राहत, सत्ताधारी पक्षावर टीका केली. यानंतर शिवसेना शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून टीका करण्यात आली. ते म्हणाले की, "चार भिंतींच्या आत बसलो किंवा घरात बसलो, तर लोकांच्या भावना कशा कळणार? आज अधिवेशनात बोलणारे अडीच-तीन वर्षात पहिल्यांदाच नागपूरला आले असतील. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका." अशी टीका केली.

ते पुढे म्हणाले की, "लोकांच्या, कार्यकर्त्याच्या भावना जाणून घेण्यासाठी तसे काम करावे लागते. लोकांना भेटावे लागते, त्यांच्यात मिसळावे लागते. कार्यकर्त्यांनाही जपावं लागत. ५० आमदारांसह १३ खासदार का गेले? याचे आत्मपरीक्षण त्यांनी करायला हवे. लोक पक्ष सोडून का चालले आहेत? हे त्यांनी तपासायला हवे. हे डबल इंजिन सरकार आहे, चांगले काम करत आहे. तुम्ही अडीच वर्ष घरी बसून काम केले, राज्याला मागे घेऊन गेले, अशी टीका त्यांनी केली.

जपानमध्ये ७.१ तीव्रतेचा भूकंप; त्सुनामीचा इशारा, हादरवणारे Video व्हायरल

पत्नीचा जीव जात असताना मोबाईलमध्ये VIDEO शूट; पतीच्या कृत्याने पोलिसही हादरले

'चुकून व्हिडिओ हटवला'; पंतप्रधान मोदींच्या फेसबुक पोस्टप्रकरणी Meta ची माफी

रेल्वेच्या AC डब्यात चक्क दिवा लावून पूजा; प्रवाशाचा VIDEO चर्चेत; अशी चूक करू नका; प्रवासात 'या' वस्तू आहेत बॅन!

लातूरमध्ये माथेफिरू प्रवाशाने ओढले स्टेअरिंग; एसटी दोन स्कूलबसना धडकली, ५ जण जखमी, Video