प्रातिनिधिक छायाचित्र  
महाराष्ट्र

Sindhudurg : आंबा -काजू नुकसान भरपाई; आज नांदगावला 'हायवे रोको'

सिंधुदुर्गात आंबा आणि काजू पिकाला नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी सोमवार २३ मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजता नांदगाव येथे मुंबई - गोवा महामार्ग रोखण्यात येणार आहे. शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व आंबा-काजू बागायतदार व शेतकरी सहभागी होणार आहेत.

Swapnil S

कणकवली : सिंधुदुर्गात आंबा आणि काजू पिकाला नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी सोमवार २३ मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजता नांदगाव येथे मुंबई - गोवा महामार्ग रोखण्यात येणार आहे. शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व आंबा-काजू बागायतदार व शेतकरी सहभागी होणार आहेत.

बदलत्या हवामानामुळे आणि अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील आंबा - काजू फळ पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून गेला महिनाभर शेतकरी आणि बागायतदार आक्रमक बनले असून शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करीत आहेत. दरम्यान आंब्याला हेक्टरी पाच लाख आणि काजूला हेक्टरी तीन लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांची आणि बागायतदारांची मागणी आहे.

गेल्याच आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी अचानकपणे मोर्चासमोर येऊन अधिवेशन काळात याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले होते. उद्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. सरकारचा निर्णय होवा अथवा न होवो आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम असून २३ तारखेला ‘चक्का जाम’ आंदोलन होणारच असा निर्धार शेट्टी यांनी व्यक्त केला होता त्यानुसार सोमवारी सकाळी साडेदहा वाजता हे आंदोलन होणार आहे

भोंदू खरातचा पाय खोलात; व्यवहार केल्यापासून मुलगा बेपत्ता : स्थानिक शेतकऱ्याच्या आरोपानंतर पाथर्डीत संतापाची लाट

खरात प्रकरणाचे विधिमंडळात उमटणार पडसाद; राज्य विधिमंडळ अधिवेशनाचा आजपासून शेवटचा आठवडा

खरात प्रकरणाचा भांडाफोड आम्हीच केला : मुख्यमंत्री; कोण कोण त्याच्याकडे जायचे याचे पुरावेही हाती; कोर्टात उद्या करणार हजर

विदर्भातील ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे निधन

अशोक खरात प्रकरणाने राजकीय खळबळ!