संग्रहित छायाचित्र  एएनआय
महाराष्ट्र

शिंदे गटाचे काही आमदार ठाकरे गटात परतण्यास इच्छुक - सचिन अहिर

या आमदारांची संख्या १६ किंवा २० कदाचित ४० ही असू शकते, असेही अहिर म्हणाले.

Swapnil S

मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर राज्यात पुन्हा एकदा राजकीय घडामोडी वेगाने घडायला सुरुवात झाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे काही आमदार पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याकडे जाण्याच्या मन:स्थितीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनीदेखील याला दुजोरा दिला आहे.

लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर शिंदे गटात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या मतदारसंघात, कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. आता आपले सरकार जाणार ही भीती त्यांच्या मनात असू शकते. हे स्वाभाविक आहे. लोकसभा निवडणुकांच्या वेळीदेखील शिंदे गटातील काही आमदारांनी ठाकरे गटाशी संपर्क साधला होता. आम्ही लोकसभेला तुम्हाला मदत करू, पण विधानसभेला आम्हाला संधी द्या, अशी विनंती काही आमदारांनी केल्याचे सचिन अहिर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. या आमदारांची संख्या १६ किंवा २० कदाचित ४० ही असू शकते, असेही अहिर म्हणाले.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मात्र शिंदे गटातील आमदारांसाठी आमचे दरवाजे बंद असल्याचे आधीच स्पष्ट केले आहे. मात्र, राजकीय परिस्थितीचा विचार करता ज्या आमदारांनी शिंदे गटात जाऊनही कधी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कटु शब्दांत टीका केली नाही, अशा काही आमदारांचा विचार होऊ शकतो, अशी शक्यता आहे.

गणपती गेले गावाला...! 'पुढच्या वर्षी लवकर या'चा घुमला जयघोष; दहा दिवसांच्या गणेश मूर्तीचे उत्साहात विसर्जन

Mumbai : लालबागचा राजाच्या विसर्जनाला विलंब? तराफ्यावर मूर्ती चढवताना अडचणी

Maharashtra : बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; राज्यात ७ जणांचा मृत्यू

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा गजाआड; गोंधळ माजवण्यासाठी पाठवला संदेश

चौकशीची मागणी माझी वैयक्तिक! अंजना कृष्णा धमकीप्रकरणी मिटकरी यांचे घूमजाव