प्रातिनिधिक छायाचित्र  ANI
महाराष्ट्र

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गोड बातमी; महागाई भत्त्यात २ टक्के वाढ

राज्य सरकारने कर्मचाऱ्यांसह पेन्शनधारकांसाठी महागाई भत्त्यात (डीए) २ टक्के वाढ करण्यास मान्यता दिली आहे. सोमवारी यासंदर्भातील निर्णय जारी करण्यात आला.

Swapnil S

मुंबई : राज्य सरकारने कर्मचाऱ्यांसह पेन्शनधारकांसाठी महागाई भत्त्यात (डीए) २ टक्के वाढ करण्यास मान्यता दिली आहे. सोमवारी यासंदर्भातील निर्णय जारी करण्यात आला.

सध्या, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ५३ टक्के महागाई भत्ता मिळत आहे. आता २ टक्के वाढीसह, त्यांना त्यांच्या नियमित पगारात ५५ टक्के महागाई भत्ता मिळेल. ही वाढ यंदाच्या जानेवारीपासून लागू होईल आणि ती चालू महिन्याच्या पगारासह दिली जाईल. राज्याचा पगार आणि पेन्शनवरील खर्च दरवर्षी सुमारे २.५ लाख कोटी रुपये आहे. महागाई भत्त्यात २ टक्के वाढ केल्याने राज्याच्या अर्थव्यवस्थेवर मोठा भार पडणार आहे.

सध्या ७ लाखांहून अधिक कर्मचारी सरकारच्या सेवेत आहेत. त्याशिवाय राज्याने निमसरकारी कर्मचारी आणि अनुदानित संस्थांच्या कर्मचाऱ्यांचा पगार आणि पेन्शनसाठी मोठा निधी राखून ठेवला आहे.

आठवीच्या 'त्या' पुस्तकावर संपूर्ण बंदी! सुप्रीम कोर्टाने NCERT ला घेतले फैलावर; म्हणाले - 'हा सुनियोजित कट, दोषींना सोडणार नाही'

हायवेवर फूड कोर्ट, पेट्रोल पंप किंवा जोडरस्ता हवाय? सर्व NOC आता एकाच क्लिकवर; सुधारित Rajmarg Pravesh पोर्टल लाँच

देशात 'ई-२०' इथेनॉलची विक्री १ एप्रिलपासून बंधनकारक; केंद्र सरकारचा निर्णय

Mumbai : सरकारने थकवले शिक्षण विभागाचे अनुदान; ७२४१.३८ कोटी रुपये मिळविण्यासाठी BMC चा पाठपुरावा सुरूच

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होळीची भेट; महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ