महाराष्ट्र

पर्यटनस्थळी आता भटक्या कुत्र्यांना 'नो एन्ट्री'; पर्यटकांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारचा निर्णय

राज्यात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली असून भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याने अनेकांच्या जीवावर बेतले आहे. भटक्या कुत्र्यांची वाढती दहशत लक्षात घेता पर्यटनस्थळी भटक्या कुत्र्यांना ‘नो एंट्री’ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Swapnil S

मुंबई : राज्यात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली असून भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याने अनेकांच्या जीवावर बेतले आहे. भटक्या कुत्र्यांची वाढती दहशत लक्षात घेता पर्यटनस्थळी भटक्या कुत्र्यांना ‘नो एंट्री’ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबत सोमवारी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

राज्यात वाढत चाललेल्या भटक्या कुत्र्यांच्या त्रासावर राज्य सरकारने कठोर पावले उचलली असून यापूर्वीच राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायतींना कुत्र्यांचे निर्बिजीकरण, लसीकरण अनिवार्य करण्याचे आदेश दिले आहेत. आता राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळांवर आणि पर्यटन विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या निवासस्थानांच्या परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर रोखण्यासाठी राज्य सरकारच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाने उपाययोजना करण्यावर भर दिला आहे.

Mumbai : India vs England सामन्यामुळे मरीन ड्राइव्ह परिसरात ट्रॅफिक अलर्ट; वाहतूक पोलिसांकडून पर्यायी मार्ग जाहीर, वाचा सविस्तर

Iran vs US-Israel War : मध्यपूर्वेतील संघर्षात वाढ; भारतीय नागरिकांसाठी परराष्ट्र मंत्रालयाकडून हेल्पलाइन क्रमांक जारी

Mumbai : वानखेडेवर India vs England सेमीफायनल; चाहत्यांसाठी मेट्रोच्या अतिरिक्त फेऱ्या, पाहा वेळापत्रक

Iran Israel War : जहाजांचा युद्ध विमा महाग; संघर्षामुळे अतिरिक्त प्रीमियम भरावा लागणार; विमा कंपन्यांचा निर्णय

Mumbai : होळीसाठी लोकलच्या दाराला सुपारीचं झाड बांधून नेणं पडलं महागात; RPF कडून ६ जणांविरोधात गुन्हा