महाराष्ट्र

शुभमंगल सामूहिक विवाह योजनेसाठी आता २५ हजारांचे अनुदान; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

शुभमंगल सामूहिक विवाह योजनेत अनुदानामध्ये वाढ करून २५ हजार रुपये करण्याचा निर्णय

Swapnil S

प्रतिनिधी/मुंबई

शुभमंगल सामूहिक विवाह योजनेत अनुदानामध्ये वाढ करून २५ हजार रुपये करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. सध्या सामूहिक किंवा नोंदणीकृत विवाहांसाठी मंगळसूत्र व इतर वस्तूंच्या खरेदीकरिता प्रत्येक जोडप्याला १० हजार रुपये अनुदान देण्यात येते. त्याचप्रमाणे सामुहिक विवाह राबविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना २ हजार रुपये इतके अनुदान देण्यात येते. आता जोडप्यांना २५ हजार रुपये आणि संस्थांना २५०० रुपये वाढीव अनुदान देण्यात येईल. हे अनुदान डीबीटी पद्धतीने थेट खात्यात जमा होईल.

आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय, बहुजन कल्याण आणि इतर विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विवाह योजनेत देण्यात येणाऱ्या अनुदानातही महिला व बालविकासाच्या निर्णयानुसार वाढ करण्यात येईल. यासाठी संबंधित विभागांनी तसे प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीसमोर पाठविण्याचा निर्णयही घेण्यात आला.

धरणे आटली, चिंता वाढली; औद्योगिक-व्यावसायिक पाणी वापरात आजपासून २० टक्के कपात, पाण्याचा अपव्यय आढळल्यास BMC ची कडक कारवाई

'खेला होबे' कोणाचा? लोकशाहीचा?

आजचे राशिभविष्य,१७ जून २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

International Yoga Day 2026 : रोज योगा केल्याने शरीरात होतात 'हे' बदल

चेहऱ्यावर हवी काचेसारखी चमक? ट्राय करा हा कोरियन राईस मास्क