महाराष्ट्र

ठाकरे गट ठरला मोठा भाऊ; जागावाटपात उद्धव ठाकरेंनी मारली बाजी

उद्धव ठाकरे यांनी वंचितलादेखील सोबत घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी ठरला नाही. प्रकाश आंबेडकर यांनी वेगळी वाट चोखाळली. त्यामुळे ठाकरे गटाला किती जागा मिळणार याचे औत्सुक्य होते. मात्र ठाकरे गटाला आता २१ जागा मिळाल्या आहेत.

Swapnil S

प्रतिनिधी/मुंबई : महाविकास आघाडीचे जागावाटप मंगळवारी पूर्णपणे जाहीर झाले. शिवसेना ठाकरे गट २१, काँग्रेस १७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट १० जागा असा जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम झाला आहे. यात उद्धव ठाकरे यांनीच बाजी मारली असून ठाकरे गटाला २१ जागा मिळविण्यात ते यशस्वी ठरले आहेत. यामुळे आता आघाडीत ठाकरे गटच मोठा भाऊ असणार, हे अधोरेखित झाले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना दुभंगली. मोठ्या प्रमाणात खासदारही शिंदेंसोबत गेले. त्यामुळे जागावाटपात ठाकरे गटाला किती जागा मिळणार, याकडे लक्ष होते. मिलिंद देवरा आणि संजय निरूपम यांनी जागावाटपात शिवसेनेत झालेले बंड आणि त्यानंतर ठाकरे गटाची कमी झालेली ताकद, या गोष्टी लक्षात घ्या, असे पक्षनेतृत्वाला सुचविले होते. उद्धव ठाकरे यांनी वंचितलादेखील सोबत घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी ठरला नाही. प्रकाश आंबेडकर यांनी वेगळी वाट चोखाळली. त्यामुळे ठाकरे गटाला किती जागा मिळणार याचे औत्सुक्य होते. मात्र ठाकरे गटाला आता २१ जागा मिळाल्या आहेत.

आघाडीत ठाकरे गटाला सर्वात जास्त म्हणजे २१ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसकडून सांगलीची जागादेखील त्यांनी खेचून घेतली आहे. काँग्रेसला १७ जागा मिळाल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटानेही बाजी मारली असून दोन आकडी म्हणजे १० जागा आपल्याकडे खेचून घेतल्या आहेत.

Maratha Reservation : सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उद्यापासून पाणीही बंद, आमरण उपोषण अधिक तीव्र होणार

Maratha Reservation : ''...नाहीतर १००-२०० किमीच्या रांगा लागतील''; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

''मानाला भुकालेलं पोरगं''; मनोज जरांगे यांची राज ठाकरेंवर टीका

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास