महाराष्ट्र

...तर कोऱ्या कागदावर राजीनामा देतो! मंगलप्रभात लोढा यांनी ठणकावले

मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील मंगलप्रभात लोढा यांची पाठराखण करताना सांगितले, “या आधी मंगलप्रभात लोढा यांना विचारायचो की, तुम्ही एसआरएची कामे का घेत नाहीत.

Swapnil S

नागपूर : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर देताना मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आपण कोणतेही चुकीचे काम करत नसल्याचे सांगत आरोप करायचे असतील तर पुरावे सादर करण्याचे थेट आव्हान दिले. अंबादास दानवे यांनी सभागृहात बोलताना पुराव्याशिवाय आरोप केल्यानंतर, काही चुकीचं केलं असेल तर थेट कोऱ्या कागदावर सही करून राजीनामा देत असल्याचं मंगलप्रभात लोढा यांनी जाहीर केलं.

मंत्री लोढा म्हणाले, “मी अनेक वर्षांपासून माझ्या कुटुंबाच्या व्यवसायात नाही. जर माझ्या कुटुंबियांकडून अवैध व्यवसाय होत असेल तर मी कोऱ्या चिठ्ठीवर सही करून राजीनामा लिहून देतो. आम्ही एकही अनधिकृत बांधकाम केले नाही. आम्ही अनधिकृत व्यवसाय करत नाही. पदाचा मी गैरवापर करत नाही. तुम्ही पुरावे द्या, ते घेण्यासाठी मी स्वत: येतो. हे जे काही चाललंय ते बरोबर नाही. कोणाच्या कुटुंबाने व्यवसाय, नोकरी काही करायचाच नाही का? बेरोजगार बसून राहायचा का? माझं काम अतिशय पारदर्शक आहे, कुणी एका रुपयाचा माझ्यावर आक्षेप घेऊ शकत नाही. मंत्रीपदावर असतानादेखील मी कोणताही व्यक्तिगत फायदा घेतलेला नाही.”

मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील मंगलप्रभात लोढा यांची पाठराखण करताना सांगितले, “या आधी मंगलप्रभात लोढा यांना विचारायचो की, तुम्ही एसआरएची कामे का घेत नाहीत. तेव्हा लोढा यांनी स्पष्ट केले होते की, सरकारकडून कोणतेही प्रकल्प मला नकोत. माझ्या नावावर एक रुपयाचादेखील डाग लागला नाही पाहिजे. ही काळजी मी घेतो असे लोढा म्हणाले होते.”

ओला दुष्काळ जाहीर करण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नकार; पण सर्व सवलती लागू, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! क्वेट्टामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, १० ठार, भयानक व्हिडिओ समोर

Dombivali : झोपेतच सर्पदंश! ३ वर्षांच्या चिमुकलीसह मावशीचा मृत्यू; KDMC रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत