महाराष्ट्र

फसगत करणारे हे फसवे सरकार -वडेट्टीवार

दोनदा नाकारलेले आरक्षण पुन्हा तिसऱ्यांदा देणे हे म्हणजे निवडणुका मारून नेण्याचा प्रकार आहे

Swapnil S

मुंबई : फसगत करणारे हे फसवे सरकार आहे. मराठा समाजाची या सरकारने फसगत केली आहे. हे येणारा काळ महाराष्ट्र बघेल. यामागील कारण असे आहे की, १० टक्के आरक्षण देत असताना याला आधार कुठला हे तपासले नाही. याला कुठलाच कायदेशीर आधार नाही. हे कायद्याच्या कचाट्यात बसणारे आरक्षण नाही. ५० टक्क्यांवर आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. पण मुख्यमंत्री म्हणतात की, तसा तो अधिकार आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

आम्ही विरोध केला असता तर आमच्या नावाने बोंबाबोंब केली असती, त्यामुळे आम्हाला समर्थन द्यावे लागले. वस्तुस्थिती ही आहे की, निवडणुका मारून नेण्यासाठी हे केले जात आहे. मागच्या वेळी २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारने तेच केले आणि आता शिंदे सरकारनेही तेच केले. निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाची मते घेण्यासाठी फसवे काम या सरकारने केले आहे. दोनदा नाकारलेले आरक्षण पुन्हा तिसऱ्यांदा देणे हे म्हणजे निवडणुका मारून नेण्याचा प्रकार आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.

पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा; गुढीपाडव्यापासून १५ डब्यांच्या लोकल वाढणार, १६ उपनगरीय सेवांचे होणार रूपांतर

Gudi Padwa 2026 : उद्या स्वागत यात्रांचा मुंबईभर जल्लोष; गिरगाव, कुर्ला, दादर येथे चित्ररथ, खेळांची पर्वणी

इंदूरमध्ये EV चार्ज करताना शॉर्ट सर्किट; सिलिंडरचा भीषण स्फोट, ७ जणांचा दुर्दैवी अंत

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘रत्नागिरीचा राजा’ शहरात दाखल; हापूसच्या आगमनाने बाजारात सुगंध, दर मात्र दुपटीने वाढले

मध्य रेल्वे २०१२ उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवणार; अतिरिक्त १२० विशेष गाड्या चालविण्याचे नियोजन