महाराष्ट्र

फसगत करणारे हे फसवे सरकार -वडेट्टीवार

Swapnil S

मुंबई : फसगत करणारे हे फसवे सरकार आहे. मराठा समाजाची या सरकारने फसगत केली आहे. हे येणारा काळ महाराष्ट्र बघेल. यामागील कारण असे आहे की, १० टक्के आरक्षण देत असताना याला आधार कुठला हे तपासले नाही. याला कुठलाच कायदेशीर आधार नाही. हे कायद्याच्या कचाट्यात बसणारे आरक्षण नाही. ५० टक्क्यांवर आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. पण मुख्यमंत्री म्हणतात की, तसा तो अधिकार आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

आम्ही विरोध केला असता तर आमच्या नावाने बोंबाबोंब केली असती, त्यामुळे आम्हाला समर्थन द्यावे लागले. वस्तुस्थिती ही आहे की, निवडणुका मारून नेण्यासाठी हे केले जात आहे. मागच्या वेळी २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारने तेच केले आणि आता शिंदे सरकारनेही तेच केले. निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाची मते घेण्यासाठी फसवे काम या सरकारने केले आहे. दोनदा नाकारलेले आरक्षण पुन्हा तिसऱ्यांदा देणे हे म्हणजे निवडणुका मारून नेण्याचा प्रकार आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस