उद्धव ठाकरे संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

पक्षबांधणीसाठी उद्धव ठाकरे सरसावले; २० व २५ फेब्रुवारीला खासदार, आमदारांची बैठक

एकनिष्ठ शिवसैनिक पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याने उद्धव ठाकरे यांचे टेंशन वाढले आहे. त्यात खासदारही सेनेची साथ सोडणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना राजापूर विधानसभा मतदारसंघातील कट्टर शिवसैनिक राजन साळवी यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. पक्षाला लागलेली गळती रोखण्यासाठी, पक्षात नेमके काय सुरू आहे, खासदार, आमदारांच्या मनात नेमके काय याची झाडाझडती घेण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : एकनिष्ठ शिवसैनिक पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याने उद्धव ठाकरे यांचे टेंशन वाढले आहे. त्यात खासदारही सेनेची साथ सोडणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना राजापूर विधानसभा मतदारसंघातील कट्टर शिवसैनिक राजन साळवी यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. पक्षाला लागलेली गळती रोखण्यासाठी, पक्षात नेमके काय सुरू आहे, खासदार, आमदारांच्या मनात नेमके काय याची झाडाझडती घेण्यात येणार आहे. यासाठी उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर खासदारांची २० फेब्रुवारीला, तर आमदारांची २५ फेब्रुवारी रोजी बैठक बोलावली आहे.

ज्यांना जायचय त्यांनी जा, कट्टर शिवसैनिक बरोबर असून शिवसेना भक्कम उभी आहे, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. मात्र काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या रणरागिणी म्हणून ओळख असलेल्या वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील नेत्या राजुल पटेल यांनी ठाकरेंच्या सेनेला जय महाराष्ट्र केला. तर काही खासदार ठाकरेंची साथ सोडणार अशी चर्चा सुरू आहे.

पक्षातील खासदार, आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याने उद्धव ठाकरे यांचे टेंशन वाढले आहे. पक्षाला सावरण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदार, आमदारांची बैठक बोलावली आहे. तसेच विधानसभेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदारांची बैठक होणार आहे. आगामी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेत्याचे नाव निश्चित करण्यासाठी बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

INS Udaygiri: ‘उदयगिरी’ भारतीय नौदलाच्या ताफ्यात; स्वीकृती दस्तावेजावर स्वाक्षरी, बघा काय आहे खासियत?

पंढरपूर वारीत अर्बन नक्षलवादी? विधानसभेत आमदार मनीषा कायंदे काय म्हणाल्या? बघा Video

कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्र सरकारची मंजुरी; प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पालिका करणार हायकोर्टात अर्ज

पुण्यातील नद्यांच्या पूररेषा नव्याने आखाव्यात; ४ महिन्यांत काम पूर्ण करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

Dombivli : ''घरी कोणीही नाही, फाशी घे''...तरुणीचा WhatsApp मेसेज अन् तरुणाने उचललं टोकाचं पाऊल; गुन्हा दाखल