महाराष्ट्र

जिल्ह्यात अवकाळी पावसाचे आगमन; रायगडमध्ये जनजीवन विस्कळीत

पेणमध्ये सुरू झालेल्या पावसाने आंबा आणि कडधान्य शेतकऱ्याची मात्र धावपळ सुरू

अरविंद गुरव

रायगड (Raigad) जिल्ह्यात पहाटे पासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने सकाळी ८च्या सुमारास पावसाने सुरुवात केल्याने जनजीवन विस्कळीत झाले. पेणमध्ये (Pen) सुरू झालेल्या पावसाने आंबा आणि कडधान्य शेतकऱ्याची मात्र धावपळ सुरू झाली. या अवेळी पावसाने आंबा, कांदा आणि कडधान्य उत्पादकांना फटका बसला आहे.

जिल्ह्यात गेल्या आठवड्यात ही अवेळी पावसाचे आगमन झाले होते. यावेळी पेण, खालापुर, रोहा, कर्जत तालुक्याला मोठा फटका बसला होता. पुन्हा आज सकाळ पासून सुरू झालेल्या पावसाने शेतकरी तसेच नागरिकांची तारांबळ उडाली. सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही आडोसा शोधावा लागला. आंबा आणि कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांची आपले पिक वाचविण्यासाठी धावपळ सुरू झाली होती. तसेच या अवकाळी पावसामुळे हाती आलेल्या आंबा पिकाला मोठा फटका बसला आहे. अचानक सुरू झालेल्या या अवकाळी पावसाने शेतकरी मात्र चिंतेत सापडला आहे.

आजच्‍या पावसाने आंबा पीका बरोबरच कडधान्‍य पीकाला मोठा फटका बसणार आहे. कडधान्‍य पिकांच्‍या काढणीचा हंगाम सध्‍या अंतिम टप्‍प्‍यात आहे. उरलेसुरले पीक घरात घेवून येण्‍यासाठी शेतकरयांची लगबग सुरू असतानाच आज पावसाने दाणादाण उडवली. आधीच नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे झालेले नाही आहेत. त्यात पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे.

गुजरातच्या सत्तेत मोठा फेरबदल; मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल वगळता संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा, उद्या नवे मंत्री शपथ घेणार

Mumbai : पूजा खेडकरच्या वडिलांना न्यायालयाचा दिलासा, ट्रक क्लिनर अपहरण प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर

Canada News : कपिल शर्माच्या ‘कॅप्स कॅफे’वर पुन्हा गोळीबार; लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली जबाबदारी, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

धक्कादायक! रशियात नोकरीचं आमिष दाखवून युक्रेनसोबतच्या युद्धात लढायला पाठवलं; "माझ्या पतीला भारतात परत आणा" - पत्नीची याचना

जिंकलंस भावा! कर्जतच्या तरुणाने मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर केली महिलेची प्रसूती; डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करून वाचवले दोन जीव