महाराष्ट्र

जिल्ह्यात अवकाळी पावसाचे आगमन; रायगडमध्ये जनजीवन विस्कळीत

अरविंद गुरव

रायगड (Raigad) जिल्ह्यात पहाटे पासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने सकाळी ८च्या सुमारास पावसाने सुरुवात केल्याने जनजीवन विस्कळीत झाले. पेणमध्ये (Pen) सुरू झालेल्या पावसाने आंबा आणि कडधान्य शेतकऱ्याची मात्र धावपळ सुरू झाली. या अवेळी पावसाने आंबा, कांदा आणि कडधान्य उत्पादकांना फटका बसला आहे.

जिल्ह्यात गेल्या आठवड्यात ही अवेळी पावसाचे आगमन झाले होते. यावेळी पेण, खालापुर, रोहा, कर्जत तालुक्याला मोठा फटका बसला होता. पुन्हा आज सकाळ पासून सुरू झालेल्या पावसाने शेतकरी तसेच नागरिकांची तारांबळ उडाली. सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही आडोसा शोधावा लागला. आंबा आणि कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांची आपले पिक वाचविण्यासाठी धावपळ सुरू झाली होती. तसेच या अवकाळी पावसामुळे हाती आलेल्या आंबा पिकाला मोठा फटका बसला आहे. अचानक सुरू झालेल्या या अवकाळी पावसाने शेतकरी मात्र चिंतेत सापडला आहे.

आजच्‍या पावसाने आंबा पीका बरोबरच कडधान्‍य पीकाला मोठा फटका बसणार आहे. कडधान्‍य पिकांच्‍या काढणीचा हंगाम सध्‍या अंतिम टप्‍प्‍यात आहे. उरलेसुरले पीक घरात घेवून येण्‍यासाठी शेतकरयांची लगबग सुरू असतानाच आज पावसाने दाणादाण उडवली. आधीच नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे झालेले नाही आहेत. त्यात पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे.

... तर तुम्हाला नक्कीच सुवर्णपदक मिळेल; फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ पोस्ट करत रोहित पवारांचा टोला

अमित शहांच्या भाषणाचा एडिट केलेला व्हिडिओ व्हायरल, FIR दाखल

विनातिकिट प्रवास हा गुन्हाच- हायकोर्ट; उच्चपदस्थ अधिकाऱ्याला तूर्तास दिलासा

माढ्यात फडणवीसांनीही टाकला डाव; अभिजित पाटील, धवलसिंह भाजपच्या गळाला?

दक्षिण भारतात पाण्याची भीषण टंचाई, केवळ १७ टक्के जलसाठा; महाराष्ट्र, गुजरातमध्येही परिस्थिती भीषण