महाराष्ट्र

मोबाईल बंदीमुळे मतदारांचा गोंधळ; उपाययोजना करण्याची केली मागणी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी राज्यभर मतदान प्रक्रिया पार पडली. लोकशाहीच्या उत्साहात मतदारांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. मात्र मतदान केंद्राच्या बाहेरच मोबाईल बंदी केल्याने मोबाईल द्यायचा कोणाकडे? असा प्रश्न मतदारांना सतावत होता.

Swapnil S

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी राज्यभर मतदान प्रक्रिया पार पडली. लोकशाहीच्या उत्साहात मतदारांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. मात्र मतदान केंद्राच्या बाहेरच मोबाईल बंदी केल्याने मोबाईल द्यायचा कोणाकडे? असा प्रश्न मतदारांना सतावत होता. अखेर रांगेतील व्यक्तींकडे मोबाईल देत मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मोबाईल बंदी न करता केंद्रांवर मोबाईल जमा करून मतदान करता येईल यासाठी काही तरी उपाययोजना करण्यात याव्यात अशा सूचना मतदारांनी केल्या.

बुधवारी सकाळी ७ वाजल्यापासून मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी होऊ लागली. लोकशाहीच्या उत्साहात मोठ्या उत्साहात सहभागी होण्यासाठी आलेल्या मतदारांना मतदान केंद्रावर आल्यावर गैरसोयीचा सामना करावा लागला. कारण होते मोबाईल बंदी. मतदान केंद्रांवर मोबाईल बंदी याबाबत विविध माध्यमातून जनजागृती मोहीम राबवण्यात आली होती. मात्र मतदान करून पुन्हा कामासाठी बाहेर पडलेले किंवा कामावर जाणाऱ्या मतदारांना गैरसोयीचा सामना करावा लागला. मतदान केंद्रावर आल्यावर आत मोबाईल घेऊन जाण्यास बंदी असल्याचे पोलिसांनी प्रवेशद्वारावर सांगितल्यानंतर मोबाईल ठेवायचा कुठे? असा प्रश्न मतदारांना पडला होता. सोबत कोणी असल्यास मोबाईल त्याच्याकडे देत काहींनी मतदानाचा हक्क बजावला. मात्र एकट्याच आलेल्या मतदाराला मोठी अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे या पुढील निवडणुकीत मोबाईल बंदी केली तरी मतदाराचा मोबाईल सुरक्षित राहिल याची दक्षता निवडणूक आयोगाने घ्यावी अशी मागणी मतदार राजांनी केली.

ठाकरे बंधूंची यंदा 'एकत्र' दिवाळी! मनसे दीपोत्सवाचे उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते

वडिलांपेक्षा मुलगा वयाने मोठा कसा? सर्वपक्षीय शिष्टमंडळाची निवडणूक आयोगासमोर प्रश्नांची सरबत्ती, राज ठाकरेंच्या प्रश्नांनी वेधले लक्ष

IPS पूरन कुमार प्रकरणाला नवे वळण; तपास करणाऱ्या IAS अधिकाऱ्याचीही आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये गंभीर आरोप

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण : मुख्य आरोपी वीरेंद्र तावडेसह दोघांना जामीन

जैसलमेरमध्ये भीषण अपघात; खासगी बसला अचानक लागली आग, गाडी जळून खाक, ५७ जण करत होते प्रवास