महाराष्ट्र

जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडले; ३१४४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू, गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

गोदावरी नदीपात्रात कोणीही प्रवेश करू नये व कुठलीही जीवित व वित्तहानी होऊ नये याकरिता नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी व सतर्क राहावे, असे आवाहन

Swapnil S

छत्रपती संभाजीनगर : जायकवाडी जलाशय ९८ टक्के क्षमतेने भरले असून पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसाच्या पाण्याची आवक व उर्ध्व भागातील धरणांमधून येणारी आवक बघता सोमवारी दुपारच्या सुमारास नाथसागर जलाशयाच्या सांडव्याद्वारे ६ दरवाजे उघडून गोदावरी नदीपात्रात ३१४४ क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

सध्याच्या स्थितीत एकूण ६ दरवाजे प्रत्येकी ५ फुटाने उघडण्यात आले असून एकूण ३१४४ क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी दिली आहे.

गोदावरी नदीपात्रात कोणीही प्रवेश करू नये व कुठलीही जीवित व वित्तहानी होऊ नये याकरिता नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी व सतर्क राहावे, असे आवाहन प्रशांत जाधव यांनी केले आहे. याप्रसंगी तांत्रिक विभागाचे विजय काकडे, गणेश खरडकर आदींची उपस्थिती होती.

जलाशयाच्या पायथ्याशी पोलीस बंदोबस्त

जलाशयाच्या पायथ्याशी असलेल्या पुलाच्या परिसरात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शकाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच ठिकठिकाणी बॅरिगेट लावण्यात आले होते.

Jharkhand Student Protest : भरती परीक्षांविरोधातील आंदोलन तीव्र; पोलिसांना धक्काबुक्की, ABVP चे ११० कार्यकर्ते ताब्यात

Mumbai-Pune Expressway : 'मिसिंग लिंक' उद्या ३ तास बंद; प्रवासाला निघण्यापूर्वी वाचा महत्त्वाची बातमी

IPL क्रिकेटपटू अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचाराचा आरोप

Government Holiday : मुंबईकरांना दहीहंडीऐवजी रक्षाबंधनला सुट्टी; ऑगस्टअखेरीस मिळणार सलग ३ दिवसांचा ब्रेक

Mumbai : 'लोकलमधील ३ डबे विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवा'; Gen Z, Gen Alpha साठी तेजस्वी घोसाळकरांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी