महाराष्ट्र

आम्ही तीन पिढ्या वीजबिल भरले नाही, शिंदे गटाच्या खासदाराचे वादग्रस्त विधान

आम्ही तीन पिढ्या वीजबिल भरलेले नाही. डीपी जळाला की हजार-दोन हजार रुपये इंजिनिअरला देतो आणि डीपी आणून बसवतो, असे वादग्रस्त विधान शिंदे गटाचे नेते व केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आहे.

Swapnil S

मुंबई: आम्ही तीन पिढ्या वीजबिल भरलेले नाही. डीपी जळाला की हजार-दोन हजार रुपये इंजिनिअरला देतो आणि डीपी आणून बसवतो, असे वादग्रस्त विधान शिंदे गटाचे नेते व केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आहे.

निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने शेतकऱ्यांची वीजबिले माफ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांच्याच पक्षाचे व केंद्रीय मंत्रिपद भूषवणारे प्रतापराव जाधव यांनी स्वतःच आपण तीन पिढ्यांपासून वीजबिल भरत नसल्याची आपल्याच कबुली देऊन मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणल्याचे बोलले जात आहे.

Mumbai : पिण्याच्या पाण्याची स्थिती गंभीर; धरण क्षेत्रात समाधानकारक पावसाची प्रतीक्षा

प्रथमच 'फायर इंजिन'चे स्टेअरिंग महिलेच्या हाती; आत्मविश्वास असेल तर अशक्य ही शक्य - पल्लवी पाटील यांचा विश्वास

लग्नपत्रिकेत वधूवरांची जन्म तारीख बंधनकारक करण्याचा विचार; बालविवाह रोखण्यासाठीचा उपाय

यंदाची आषाढी वारी जगभर पोहोचणार; डिस्कव्हरी आणि जिओग्राफी वाहिन्यांवरून थेट प्रक्षेपण

मान्सूनने महाराष्ट्र घेतला कवेत; १४ जिल्ह्यांत ‘ऑरेंज अलर्ट’