महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात महिला मेळावा; महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत ३ मार्चला इचलकरंजी येथे आयोजन

या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात अंमलबजावणी यंत्रणांचा आढावा जिल्हाधिकारी अमोल येडगे व मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकारी यांनी घेतला.

Swapnil S

कोल्हापूर : राज्यामध्ये महिलांच्या संदर्भात असणाऱ्या शासकीय योजना लोकाभिमुख करून त्यांची अंमलबजावणी गतीमान करण्यासाठी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्हयातील जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन इचलकरंजी शहराजवळील कोरोची गावातील मैदानावर रविवार, दि. ३ मार्च रोजी करण्यात आले आहे. या मेळाव्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते विविध शासकीय योजनांचे लाभ महिला लाभार्थ्यांना वितरीत करण्यात येणार आहेत.

या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात अंमलबजावणी यंत्रणांचा आढावा जिल्हाधिकारी अमोल येडगे व मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकारी यांनी घेतला. यावेळी त्यांनी मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी आवश्यक सूचना सर्व संबंधित विभागांना दिल्या. खासदार धैर्यशील माने, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, अति.जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, प्रकल्प संचालक सुषमा देसाई, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुहास वाईंगडे, माविम जिल्हा समन्वय अधिकारी सचिन कांबळे, कार्यकारी अभियंता संजय पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिल्पा पाटील यांचेसह इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत प्रशासनाला आवश्यक सूचनाही केल्या. इचलकरंजी येथे होणाऱ्या या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासन सज्ज असून, हा उपक्रम राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी आदर्शवत ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकारी येडगे यांनी व्यक्त केला.

पावसाचे थैमान सुरूच; मुंबई, ठाणे, पालघरमध्ये कहर, जनजीवन विस्कळीत; नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर

पावसाला सुट्टी नाहीच! रविवारचा दिवस पावसाने गाजवला; मुंबई शहर, उपनगरात धुवांधार कायम

पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये परीक्षा लांबणीवर; शासकीय रेखाकला परीक्षा आता १ ते ५ ऑक्टोबरदरम्यान; स्वतंत्र वेळापत्रक जाहीर

...म्हणून कौटुंबिक पेन्शनला नकार नाही; महाराष्ट्र नागरी सेवेच्या तरतुदीमध्ये नमूद - न्यायालय

'लाडक्या बहिणी' चिंताग्रस्त! e-KYC करताना अनेक अडचणी; OTP न येणे, पोर्टल बंदच्या वाढत्या तक्रारी; योजनेतून बाद होण्याची भीती