मुंबई

मुंबईत १४ हजार जाहिरात फलक हटविले, विसर्जन सोहळ्यानंतर महापालिकेची कारवाई

मुंबईत अनंत चतुर्दशीच्या श्री गणेश मूर्ती विसर्जन सोहळ्यानंतर महापालिकेने केलेल्या कारवाईत १८ तासांत १४ हजार ३७० बॅनर, फलक काढून टाकण्यात आले.

Swapnil S

मुंबई : मुंबईत अनंत चतुर्दशीच्या श्री गणेश मूर्ती विसर्जन सोहळ्यानंतर महापालिकेने केलेल्या कारवाईत १८ तासांत १४ हजार ३७० बॅनर, फलक काढून टाकण्यात आले.

परवाना संपलेले आणि अनधिकृतरीत्या प्रदर्शित केलेले साहित्य हटविण्यासाठी महानगरपालिकेच्या अनुज्ञापन खात्याकडून ही कारवाई करण्यात आली.

राजकीय फलकांचाही समावेश

धार्मिक स्वरूपाचे ७ हजार ७१५ बॅनर, ३ हजार १७४ फलक (बोर्ड) आणि ५७९ पोस्टर्स; राजकीय स्वरूपाचे ८०७ बॅनर, ७०५ फलक (बोर्ड), ८७ पोस्टर्स; व्यावसायिक स्वरूपाचे २६० बॅनर, २७ फलक (बोर्ड), ३१ पोस्टर्स तसेच ९८५ झेंडे यांचा यामध्ये समावेश आहे.

इंडोनेशियात ६.७ तीव्रतेचा भूकंप; इमारतींचे नुकसान, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, Video

NEET UG 2026 Re-Exam : टेलिग्रामवर २२ जूनपर्यंत बंदी; परीक्षेआधी NTA चा मोठा निर्णय

जोगेश्वरी रेल्वे टर्मिनसचे ५५ टक्के काम पूर्ण; ७६.४८ कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे जानेवारी २०२७ पर्यंत लोकार्पण होण्याची शक्यता

Mumbai : वांद्रेतील मेट्रो २बीच्या बांधकामस्थळी आग; जळते अवशेष रस्त्यावर पडल्याचा व्हिडीओ व्हायरल, MMRDA चे स्पष्टीकरण

Kalyan : मोठागाव रेल्वे उड्डाणपुलासाठी निविदा जारी; २४ महिन्यांत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट