मुंबई

मुंबईत १४ हजार जाहिरात फलक हटविले, विसर्जन सोहळ्यानंतर महापालिकेची कारवाई

मुंबईत अनंत चतुर्दशीच्या श्री गणेश मूर्ती विसर्जन सोहळ्यानंतर महापालिकेने केलेल्या कारवाईत १८ तासांत १४ हजार ३७० बॅनर, फलक काढून टाकण्यात आले.

Swapnil S

मुंबई : मुंबईत अनंत चतुर्दशीच्या श्री गणेश मूर्ती विसर्जन सोहळ्यानंतर महापालिकेने केलेल्या कारवाईत १८ तासांत १४ हजार ३७० बॅनर, फलक काढून टाकण्यात आले.

परवाना संपलेले आणि अनधिकृतरीत्या प्रदर्शित केलेले साहित्य हटविण्यासाठी महानगरपालिकेच्या अनुज्ञापन खात्याकडून ही कारवाई करण्यात आली.

राजकीय फलकांचाही समावेश

धार्मिक स्वरूपाचे ७ हजार ७१५ बॅनर, ३ हजार १७४ फलक (बोर्ड) आणि ५७९ पोस्टर्स; राजकीय स्वरूपाचे ८०७ बॅनर, ७०५ फलक (बोर्ड), ८७ पोस्टर्स; व्यावसायिक स्वरूपाचे २६० बॅनर, २७ फलक (बोर्ड), ३१ पोस्टर्स तसेच ९८५ झेंडे यांचा यामध्ये समावेश आहे.

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांचे आक्रमक भाषण; म्हणाले ''हिंदू आणि हिंदुस्थान मान्य आहे; पण हिंदीची सक्ती मान्य नाही!''

''कुठचाही 'झेंडा' नाही, मराठी हाच 'अजेंडा'; माझ्या मराठीकडे-महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही,'' वाचा राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

दोघा पुतण्यांचे हात धरून सुप्रिया सुळेंनी काकांच्या शेजारी केलं उभं; पहा Video

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल