मुंबई

मुंबईत १४ हजार जाहिरात फलक हटविले, विसर्जन सोहळ्यानंतर महापालिकेची कारवाई

मुंबईत अनंत चतुर्दशीच्या श्री गणेश मूर्ती विसर्जन सोहळ्यानंतर महापालिकेने केलेल्या कारवाईत १८ तासांत १४ हजार ३७० बॅनर, फलक काढून टाकण्यात आले.

Swapnil S

मुंबई : मुंबईत अनंत चतुर्दशीच्या श्री गणेश मूर्ती विसर्जन सोहळ्यानंतर महापालिकेने केलेल्या कारवाईत १८ तासांत १४ हजार ३७० बॅनर, फलक काढून टाकण्यात आले.

परवाना संपलेले आणि अनधिकृतरीत्या प्रदर्शित केलेले साहित्य हटविण्यासाठी महानगरपालिकेच्या अनुज्ञापन खात्याकडून ही कारवाई करण्यात आली.

राजकीय फलकांचाही समावेश

धार्मिक स्वरूपाचे ७ हजार ७१५ बॅनर, ३ हजार १७४ फलक (बोर्ड) आणि ५७९ पोस्टर्स; राजकीय स्वरूपाचे ८०७ बॅनर, ७०५ फलक (बोर्ड), ८७ पोस्टर्स; व्यावसायिक स्वरूपाचे २६० बॅनर, २७ फलक (बोर्ड), ३१ पोस्टर्स तसेच ९८५ झेंडे यांचा यामध्ये समावेश आहे.

Maharashtra HSC Exam 2025 : पूरग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा; बारावीचा अर्ज भरण्यास मुदतवाढ

लॉरेन्स बिश्नोई गँग दहशतवादी संघटना म्हणून घोषित; कॅनडा सरकारचा मोठा निर्णय, टोळीसोबत व्यवहार केल्यास होणार शिक्षा

एका रात्रीत ३७ गायी, २० शेळ्यांचा बळी! पुरामुळे दुग्धव्यवसाय उद्ध्वस्त; धाराशिवच्या शेतकऱ्याचे ६० लाखांचे नुकसान, मदत अपुरी

वैष्णवी हगवणे प्रकरण : सासू-नणंदेचा पुणे न्यायालयाने फेटाळला जामीन; म्हणाले, "नऊ महिन्यांच्या बाळाची आई...

महाराष्ट्रात पावसाचे संकट; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची विशेष अधिवेशनाची मागणी