मुंबई

मानखुर्द येथे अपघातात २१ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू

चेंबूर येथे देवीचे विसर्जन झाल्यानंतर रोहन, अजय आणि साई बावस्कर असे तिघेही बाईकवरुन घरी जाण्यासाठी निघाले.

नवशक्ती Web Desk

मुंबई : मानखुर्द येथील अपघातात रोहन शंकर पाटील या २१ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला, तर त्याचे दोन मित्र जखमी झाले. याप्रकरणी अजय विजय बावस्कर या आरोपी मित्राविरुद्ध गोवंडी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. भरवेगात बाईक चालविण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याचे उघडकीस आले आहे. शंकर आकाराम पाटील हे मनखुर्द परिसरात राहत असून, ते क्रॉफर्डमार्केट येथे हमालीचे काम करतात. मृत रोहन हा त्यांचा मुलगा असून, तो तुर्भे येथील एका खाजगी कंपनीत कामाला आहे. त्यांच्या परिसरात असलेल्या साईनाथ गोविंदा पथकाने देवीच्या मूर्तीची स्थापना केली होती. शुक्रवारी देवीचे विसर्जन असल्याने रोहन हा त्याचा मित्र अजय बावस्कर याच्यासोबत विजर्सनासाठी त्याच्या बाईकवरुन गेला होता. चेंबूर येथे देवीचे विसर्जन झाल्यानंतर रोहन, अजय आणि साई बावस्कर असे तिघेही बाईकवरुन घरी जाण्यासाठी निघाले. ही बाईक रात्री दिड वाजता मानखुर्द येथील शीव-पनवेल हायवे, नॉर्थ बॉण्डवरुन जात असताना अजयचा भरवेगात बाईक चालविण्याच्या नादात नियंत्रण सुटले आणि त्यांच्या बाईकचा अपघात झाला होता.

Maharashtra HSC Exam 2025 : पूरग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा; बारावीचा अर्ज भरण्यास मुदतवाढ

लॉरेन्स बिश्नोई गँग दहशतवादी संघटना म्हणून घोषित; कॅनडा सरकारचा मोठा निर्णय, टोळीसोबत व्यवहार केल्यास होणार शिक्षा

एका रात्रीत ३७ गायी, २० शेळ्यांचा बळी! पुरामुळे दुग्धव्यवसाय उद्ध्वस्त; धाराशिवच्या शेतकऱ्याचे ६० लाखांचे नुकसान, मदत अपुरी

वैष्णवी हगवणे प्रकरण : सासू-नणंदेचा पुणे न्यायालयाने फेटाळला जामीन; म्हणाले, "नऊ महिन्यांच्या बाळाची आई...

महाराष्ट्रात पावसाचे संकट; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची विशेष अधिवेशनाची मागणी