मुंबई

पवई तलावात संगीत कारंजे उभारणार ; मुख्यमंत्र्याचे पालिकेला निर्देश

नवशक्ती Web Desk

मुंबईचे सौंदर्यीकरण सुरू असून नागपूर येथील फुटाळ तलावाच्या धर्तीवर पवई तलावात संगीत कारंजे उभारण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका आयुक्त व प्रशासक डॉ. इक्बालसिंह चहल यांना दिले आहेत. चांदिवली संघर्ष नगर येथे अद्ययावत रुग्णालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.

मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर असून देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे माया नगरी मुंबईत देशविदेशातील पर्यटकांचे रेलचेल असते. मुंबईत येणाऱ्या पर्यटकांसाठी अधिकाधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या मुंबई महापालिकेने पवई तलावात संगीत कारंजे उभारावे, असे निर्देश शिंदे यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत. मुंबईचे सौंदर्यीकरण अंतर्गत पवई तलावात संगीत कारंजे उभारण्याबाबत लवकरच प्रक्रिया राबवण्यात येईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना जमावानं जीव जाईपर्यंत मारलं, नेमका कुठं घडला प्रकार?

कांदा निर्यातबंदी उठवली! ४० टक्के निर्यातकरामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष कायम

थांबा... पुढे धोका, आज समुद्र खवळणार; हवामान विभागाचा 'अलर्ट'; समुद्रात जाणे टाळा, पालिकेचे आवाहन

भारतीय नौदल बांधणार ‘एआयपी’ तंत्रज्ञानाने पाणबुड्या; ६० हजार कोटींचा प्रकल्प!

IPL 2024: चेन्नईची प्ले-ऑफसाठी झुंज,बेभरवशी पंजाब किंग्जविरुद्ध आज लढत!