मुंबई

पोलिसांत तक्रार केली म्हणून रिक्षाचालकावर हल्ला

तिक्ष्ण हत्याराने त्यांच्यावर वार केले

नवशक्ती Web Desk

मुंबई : बोरिवली येथे बबन राजाराम सुरवसे या ५५ वर्षांच्या रिक्षाचालकावर तीनजणांच्या एका टोळीने प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यात जखमी झालेल्या बबन यांच्यावर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी राकेशसह तीन आरोपीविरुद्ध कस्तुरबा मार्ग पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे. ड्रग्जच्या सेवनामुळे मुलाच्या झालेल्या मृत्यूस जबाबदार असलेल्या ड्रग्ज तस्कराविरुद्ध पोलिसांत तक्रार केली म्हणून हा हल्ला झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. बबन हे रिक्षाचालक म्हणून काम करतात. आरोपी राकेश हा याच परिसरात राहत असून, तो ड्रग्ज तस्करी करतो. त्याच्यामुळे तिचा भाऊ राजेशला ड्रग्ज पिण्याचे व्यसन लागले होते. त्यातच राजेशचा मृत्यू झाला होता. त्यामुळे राकेशविरुद्ध बबन हे नेहमी पोलिसांत तक्रार करत होते. त्याचा राग म्हणून बुधवारी दुपारी बारा वाजता बोरिवलीतील सुधीर फडके ब्रिजवर राकेशसह त्याच्या दोन सहकाऱ्यांनी बबन सुरवसे यांच्याशी वाद घालून त्यांना बेदम मारहाण मारहाण केली. तिक्ष्ण हत्याराने त्यांच्यावर वार केले होते. या हल्ल्यात ते गंभीररीत्या जखमी झाले होते.

Mumbai : आता उद्यानांमध्ये मातांसाठी स्तनपान कक्ष; आराखडा तयार, विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीत समावेश करणार

संतापजनक! पाणी आणलं नाही म्हणून ९ वर्षांच्या मुलावर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू

Pune : नसरापूर ४ वर्षीय चिमुरडी अत्याचार-हत्या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे कोण? पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर

दिल्लीतील विवेक विहारमधील चार मजली इमारतीला भीषण आग; ९ जणांचा होरपळून मृत्यू

AC वापरताना या ७ चुका टाळा; दुर्लक्ष केल्यास आग किंवा स्फोटाचा धोका वाढू शकतो