मुंबई

Ambernath: बैलगाडा शर्यतीच्या वादातून अंबरनाथमध्ये गोळीबार

अंबरनाथ (Ambernath) एमआयडीसीतील सुदामा हॉटेलजवळ गोळीबाराची घटना समोर अली असून पुलिलिसासनचा तपस सुरु

प्रतिनिधी

बैलगाडा शर्यतीच्या वादातून अंबरनाथमध्ये दिवसाढवळ्या दोन गटांमध्ये अंधाधुंद गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना एका नामांकित हॉटेल समोर घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी चौकशी सुरु केली असून कोणीही जखमी झाले नाही.

पनवेलमधील पंढरी फडके आणि कल्याणचे राहुल पाटील ही दोन नावे बैलगाडा शर्यतीत नेहमीच चर्चेत राहिले आहेत. गेल्या वर्षीचा मोसमात या दोन्ही गटातील बैलगाड्यांना प्रवेश नाकारण्यात आला होता. हे दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात जाण्याची शक्यता असल्यामुळे ही दक्षता बाळगण्यात आली होती. मात्र आता बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू झाल्याने हे दोन गट पुन्हा एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, बैलगाडा शर्यती संदर्भात बोलवण्यात आलेल्या बैठकीत फडके आणि राहुल पाटील गटात मोठ्या प्रमाणात वाद सुरू झाले. त्यातूनच फडके गटाने पाटील गटावर अंदाधुंद गोळीबार केला. अंबरनाथच्या एमआयडीसीतील सुदामा हॉटेलजवळ गोळीबाराची ही घटना घडली. १५ ते २० गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

"मतांसाठी भगवी शाल पांघरणारे आणि फक्त मतांसाठी मत बदलणारे..."; ठाकरे बंधूंच्या युतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

उद्धव ठाकरेंसोबत युती का? राज ठाकरेंनी पोस्ट करत सांगितलं नेमकं कारण

"घेरलं होतं मातोश्रीवरील 'विठ्ठलाला' बडव्यांनी.." उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या घोषणेनंतर आशिष शेलारांचा राज ठाकरेंना टोला

ठाकरे बंधूंच्या युतीवर एकनाथ शिंदेंची कडाडून टीका; "ही युती फक्त स्वार्थासाठी आणि...

मुख्यमंत्र्यांच्या 'अल्लाह हाफिज' व्हिडिओपासून ते मुंबईचा महापौर मराठीच होणारपर्यंत...युतीच्या घोषणेवेळी नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?