मुंबई

भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण

एफएमसीजी, वीज आणि ऊर्जा कंपन्यांच्या समभागांची खरेदी झाल्याने बाजाराला लाभ झाला.

वृत्तसंस्था

भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांना चिंता दिसून आली. त्यामुळे दोलायमान व्यवहारानंतरही मंगळवारी सलग पाचव्या दिवशी मुंबई शेअर बाजारात किंचित वाढ झाली. एफएमसीजी, वीज आणि ऊर्जा कंपन्यांच्या समभागांची खरेदी झाल्याने बाजाराला लाभ झाला.

दि ३०-शेअर बीएसई सेन्सेक्स २०.८६ अंक किंवा ०.०४ टक्का वधारुन ५८,१३६.३६ वर बंद झाला. दिवसभरात तो ५८,३२८.४१ या कमाल आणि ५७,७४४.७० किमान पातळीवर होता. एकूण ३० पैकी १६ कंपन्यांच्या समभागात घसरण झाली. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी ५.४० अंक किंवा ०.०३ टक्का वधारुन १७,३४५.४५वर बंद झाला. सेन्सेक्सवर्गवारीत इंडस‌्इंड बँक, एशियन पेंट्स‌, एनटीपीसी, मारुती, हिंदुस्तान युनिलिव्हर, स्टेट बँक ऑफ इंडिया, महिंद्रा ॲण्ड महिंद्रा आणि पॉवरग्रीड यांच्या समभागात वाढ झाली. तर टेक महिंद्रा, एचडीएफसी, लार्सन ॲण्ड टुब्रो, टाटा स्टील आणि एचडीएफसी बँक यांच्या समभागात घसरण झाली. आशियाई बाजारात सेऊल, शांघाय, टोकियोमध्ये घट झाली. तर आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड ०.७२ टक्का घसरुन प्रति बॅरलचा भाव ९९.३१ अमेरिकन डॉलर्स झाला. विदेशी गुंतवणूक संस्थांनी सोमवारी भांडवली बाजारात २,३२०.६१ कोटींच्या समभागांची खरेदी केली.

Mumbai : धरणांतील पाणीसाठा घटला; BMC चे नवे नियम जाहीर, पाण्याचा गैरवापर केल्यास कारवाईचा इशारा

NEET UG 2026 Re-Exam : टेलिग्रामवर २२ जूनपर्यंत बंदी; परीक्षेआधी NTA चा मोठा निर्णय

आता डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन असेल तरच मिळेल कफ सिरप; औषध विक्रीच्या नियमात केंद्र सरकारचा मोठा बदल

पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल पुन्हा लांबणीवर; आता २० जूनला होणार निर्णय

सौरव गांगुलींकडून फेसबुक पेजविरोधात तक्रार दाखल; खोटी माहिती पसरवल्याचा आरोप