मुंबई

भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण

एफएमसीजी, वीज आणि ऊर्जा कंपन्यांच्या समभागांची खरेदी झाल्याने बाजाराला लाभ झाला.

वृत्तसंस्था

भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांना चिंता दिसून आली. त्यामुळे दोलायमान व्यवहारानंतरही मंगळवारी सलग पाचव्या दिवशी मुंबई शेअर बाजारात किंचित वाढ झाली. एफएमसीजी, वीज आणि ऊर्जा कंपन्यांच्या समभागांची खरेदी झाल्याने बाजाराला लाभ झाला.

दि ३०-शेअर बीएसई सेन्सेक्स २०.८६ अंक किंवा ०.०४ टक्का वधारुन ५८,१३६.३६ वर बंद झाला. दिवसभरात तो ५८,३२८.४१ या कमाल आणि ५७,७४४.७० किमान पातळीवर होता. एकूण ३० पैकी १६ कंपन्यांच्या समभागात घसरण झाली. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी ५.४० अंक किंवा ०.०३ टक्का वधारुन १७,३४५.४५वर बंद झाला. सेन्सेक्सवर्गवारीत इंडस‌्इंड बँक, एशियन पेंट्स‌, एनटीपीसी, मारुती, हिंदुस्तान युनिलिव्हर, स्टेट बँक ऑफ इंडिया, महिंद्रा ॲण्ड महिंद्रा आणि पॉवरग्रीड यांच्या समभागात वाढ झाली. तर टेक महिंद्रा, एचडीएफसी, लार्सन ॲण्ड टुब्रो, टाटा स्टील आणि एचडीएफसी बँक यांच्या समभागात घसरण झाली. आशियाई बाजारात सेऊल, शांघाय, टोकियोमध्ये घट झाली. तर आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड ०.७२ टक्का घसरुन प्रति बॅरलचा भाव ९९.३१ अमेरिकन डॉलर्स झाला. विदेशी गुंतवणूक संस्थांनी सोमवारी भांडवली बाजारात २,३२०.६१ कोटींच्या समभागांची खरेदी केली.

Mumbai : पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमापूर्वी खळबळ; बनावट PMO अधिकाऱ्यासह बंदुकधारी बॉडीगार्डला अटक, सुरक्षा यंत्रणा सतर्क

हिंदू धार्मिक गटाच्या भेटीदरम्यान वाद; महिला कर्मचाऱ्यांना हटवलं, 'आयफेल टॉवर' बंद, नेमकं काय घडलं?

तिसऱ्या मजल्यापर्यंत पाठलाग; दिल्लीत बेदम मारहाण करत मणिपुरी संगीतकाराची हत्या, CCTV व्हिडीओ समोर

उच्च न्यायालयाचा स्टेट बँकेला दणका; मूळ कागदपत्रे परत करणे बँकेचीच कायदेशीर जबाबदारी

मेट्रो-५ च्या चाचणीची तयारी अंतिम टप्प्यात; ठाणे-भिवंडी मेट्रो मार्गावर २५ हजार व्होल्टचा वीजप्रवाह सुरू