मुंबई

यापूर्वीच अटक कारवाई व्हायला हवी होती, नवनीत राणा यांचा राऊतांवर निशाणा

पत्राचाळ प्रकरणी संजय राऊतांनी एका महिलेला शिवीगाळ केल्याचे समोर आले आहे.

वृत्तसंस्था

‘ईडी’च्या कारवाईनंतर खासदार नवनीत राणा यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. “ही कारवाई अगोदरच व्हायला हवी होती. पत्रकार म्हणून सुरुवात करणाऱ्या संजय राऊतांकडे एवढे पैसे आले कुठून. संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी पदाचा दुरुपयोग केला. संजय राऊत भ्रष्टाचारी आहेत. याअगोदरच त्यांना अटक करायला हवी होती. हा भ्रष्टाचारविरोधात लढणारा महाराष्ट्र आहे. जर चोरी केली नाही तर भीती का वाटते?,” असा सवाल नवनीत राणांनी विचारला आहे.

“पत्राचाळ प्रकरणी संजय राऊतांनी एका महिलेला शिवीगाळ केल्याचे समोर आले आहे. या संभाषणाची ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली आहे. जर तुम्ही स्वच्छ चारित्र्याचे आहात, तर तुम्ही आत्तापर्यंत ‘ईडी’समोर जाऊन आपली बाजू का मांडली नाही. सगळे पुरावे असल्याशिवा ‘ईडी’ कोणावरही कारवाई करत नाही. सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा याबाबत निकाल दिला आहे. संजय राऊत महाविकास आघाडीचे एजंट बनले होते. जवळजवळ २५ ते ३० कंपन्यांमध्ये राऊत भागीदार आहेत. संजय राऊतांनी भ्रष्टाचार केला आहे, त्यामुळे त्यांना अटक होणारच,” असा विश्वासही नवणीत राणांनी व्यक्त केला.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पुन्हा लांबणीवर; सर्वोच्च न्यायालयाने दिली नवी 'डेडलाईन', आयोगालाही फटकारले

खाडाखोड असेल तर मराठ्यांना प्रमाणपत्र देऊ नये; ओबीसी उपसमितीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

महाराष्ट्र कॅबिनेट बैठकीत ८ मोठे निर्णय; ॲनिमेशन-गेमिंग धोरणासह विद्यार्थ्यांना दिलासा

महाराष्ट्र सदन घोटाळा : बांधकाम करणारे चिमणकर बंधू दोषमुक्त; मंत्री छगन भुजबळ यांना दिलासा

Mumbai : इलेक्ट्रिक बाइक टॅक्सी सेवा आजपासून सुरू; एक किमीला १५ रुपये भाडे; राज्य परिवहन प्राधिकरणाची परवानगी