मुंबई

बोरिवलीत एटीएसची धडक कारवाई; दिल्लीहून आलेल्या सहा जणांच्या मुसक्या आवळल्या, बंदुकांसह जिवंत काडतुसे जप्त

बोरिवलीतील एका गेस्ट हाऊसवर काही लोक लपून बसले असल्याची माहिती एटीएसच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.

Rakesh Mali

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या(ATS) मुंबई युनिटने धडक कारवाई केली आहे. एटीएसने मुंबईतील बोरिवली परिसरातील एका गेस्ट हाऊसवर छापा टाकत सहा जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 3 बंदुका आणि 36 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. बोरिवलीतील एका गेस्ट हाऊसवर काही लोक लपून बसले असल्याची माहिती एटीएसच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले सर्वजण हे दिल्ली येथील रहिवासी आहेत. हे लोक दिल्लीहून मुंबईत कशासाठी आले होते? त्यांचा काही घातपात करण्याचा हेतू होता का? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. एटीएसकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.

देशभरातील सार्वजनिक ठिकाणांहून भटक्या कुत्र्यांना हटवा; सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश

लाडकी बहीण योजनेत १८ नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करणे अनिवार्य

Thane : पालिका निवडणुकीची सूत्रे आमदार संजय केळकरांकडे; ठाण्यात शिंदे सेना आणि भाजपमध्ये तणाव वाढणार

बांगलादेशात कांद्याचे भाव शंभरी पार; भारतीय निर्यातदारांकडून आयातबंदी उठवण्याची मागणी

वैद्यकीय अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांची पाठ! तिसऱ्या फेरीनंतरही वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ३८७ जागा रिक्त