मुंबई

बोरिवलीत एटीएसची धडक कारवाई; दिल्लीहून आलेल्या सहा जणांच्या मुसक्या आवळल्या, बंदुकांसह जिवंत काडतुसे जप्त

बोरिवलीतील एका गेस्ट हाऊसवर काही लोक लपून बसले असल्याची माहिती एटीएसच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.

Rakesh Mali

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या(ATS) मुंबई युनिटने धडक कारवाई केली आहे. एटीएसने मुंबईतील बोरिवली परिसरातील एका गेस्ट हाऊसवर छापा टाकत सहा जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 3 बंदुका आणि 36 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. बोरिवलीतील एका गेस्ट हाऊसवर काही लोक लपून बसले असल्याची माहिती एटीएसच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले सर्वजण हे दिल्ली येथील रहिवासी आहेत. हे लोक दिल्लीहून मुंबईत कशासाठी आले होते? त्यांचा काही घातपात करण्याचा हेतू होता का? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. एटीएसकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.

मुंबईतील प्रवेशद्वारावर पार्किंग हब; पालिका १५०० कोटी रुपये खर्च करणार

ठाण्यातील ९४ टक्के रिक्षाचालक मराठीबहाद्दर; RTO च्या तपासणीत उघड

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड : ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पात अडथळा ठरणाऱ्या बांधकामांवर हातोडा

IIT मुंबईच्या प्लेसमेंटमधील वेतनामध्ये वाढ; नोकरीच्या संधीमध्ये किंचित घट, वेतनामध्ये तब्बल १० टक्क्यांनी वाढ

Mumbai : पश्चिम उपनगरातील रस्ते होणार खड्डेमुक्त; मास्टिक तंत्रज्ञानाचा वापर करणार