मुंबई

प्रवासी घटले, उत्पन्न मात्र ‘बेस्ट’; तिकीट दरवाढीचा परिणाम, दैनंदिन महसूल 'इतक्या' कोटींवर

आर्थिक संकटातून सावरण्यासाठी बेस्ट उपक्रमाने बेस्ट बसच्या साध्या व वातानुकूलित तिकीट दरात ९ मे पासून वाढ केली. साध्या बसचे तिकीट ५ रुपयांवरून १० रुपये, तर एसी बसचे तिकीट ६ रुपयांवरून १२ रुपये केले. मात्र तिकीट दरात वाढ केल्यानंतर ३० लाख प्रवासी संख्या २५ लाखांवर आली आहे.

Swapnil S

मुंबई : आर्थिक संकटातून सावरण्यासाठी बेस्ट उपक्रमाने बेस्ट बसच्या साध्या व वातानुकूलित तिकीट दरात ९ मे पासून वाढ केली. साध्या बसचे तिकीट ५ रुपयांवरून १० रुपये, तर एसी बसचे तिकीट ६ रुपयांवरून १२ रुपये केले. मात्र तिकीट दरात वाढ केल्यानंतर ३० लाख प्रवासी संख्या २५ लाखांवर आली आहे. परंतु प्रवासी संख्येत घट झाली असली तरी उत्पन्नात वाढ झाली असून सद्यस्थितीत रोज ३.२५ कोटींचा महसूल बेस्टच्या तिजोरीत जमा होतो.

गेल्या १० वर्षांत मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेस्ट उपक्रमाला उतरती कळा लागली असून दिवसेंदिवस आर्थिक कोंडी वाढतच गेली

आहे. आर्थिक कोंडी फोडण्यासाठी बेस्ट उपक्रमाने मुंबई महापालिकेकडे पैशांची मागणी केली असता २०१६ ते आतापर्यंत ११ हजार कोटी रुपये बेस्ट उपक्रमाला मदत केली. तरीही बेस्टची आर्थिक कोंडी वाढतच गेल्याने अखेर बेस्ट उपक्रमाला तिकीट दरात वाढ करण्यास मुंबई महापालिकेने मंजुरी दिली. मुंबई महापालिकेच्या मंजुरीनंतर

रिजनल ट्राफिक ॲथोरिटीने तिकीट दर वाढीला मंजुरी दिली. अखेर ९ मे पासून तिकीट दरात वाढ झाली. साध्या बससाठी पहिल्या पाच किमीसाठी ५ रुपयांऐवजी १० रुपये, तर वातानुकूलित बससाठी पहिल्या पाच किमीसाठी ६ रुपयांऐवजी

१२ रुपये अशी तिकीट

दर वाढ झाली. तिकीट दर वाढ झाल्याने बेस्ट उपक्रमाच्या तिजोरीत भर पडत असली तरी प्रवासी संख्येत मात्र घट झाली आहे, असे बेस्ट उपक्रमाच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले.

प्रवासी संख्या २५ लाखांवर

९ मे पूर्वी रोजचे ३० लाख प्रवासी बेस्ट बसने प्रवास करत होते. मात्र ९ मे पासून तिकीट दरात वाढ झाली आणि प्रवासी संख्येत कमालीची घट झाली आहे.‌ ६ ऑगस्ट २०२५ रोजी उपक्रमाची प्रवासी संख्या २५ लाखांवर पोहचली असून दैनंदिन उत्पन्न हे ३.२५ कोटी इतके झाल्याचे बेस्ट उपक्रमाच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले.

ठाकरे बंधूंची यंदा 'एकत्र' दिवाळी! मनसे दीपोत्सवाचे उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते

वडिलांपेक्षा मुलगा वयाने मोठा कसा? सर्वपक्षीय शिष्टमंडळाची निवडणूक आयोगासमोर प्रश्नांची सरबत्ती, राज ठाकरेंच्या प्रश्नांनी वेधले लक्ष

IPS पूरन कुमार प्रकरणाला नवे वळण; तपास करणाऱ्या IAS अधिकाऱ्याचीही आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये गंभीर आरोप

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण : मुख्य आरोपी वीरेंद्र तावडेसह दोघांना जामीन

जैसलमेरमध्ये भीषण अपघात; खासगी बसला अचानक लागली आग, गाडी जळून खाक, ५७ जण करत होते प्रवास