मुंबई

प्रशांत कोरटकरचा जामीन रद्द करा; राज्य सरकारची हायकोर्टात धाव, याचिकेवर आज तातडीने सुनावणी

इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याचा आरोप असलेल्या तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकरचा जामीन रद्द करण्यासाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Swapnil S

मुंबई : इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याचा आरोप असलेल्या तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकरचा जामीन रद्द करण्यासाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कोरटकरला कोल्हापूरच्या कनिष्ठ न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. त्याच्या अटकेसाठी मुभा देण्याची विनंती सरकारने केली आहे. याची दखल घेत न्या. राजेश पाटील यांनी याचिकेची मंगळवारी तातडीने सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे. कोरटकरने राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याचाही आरोप आहे.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आणि प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या छावा चित्रपटावर इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी त्यांची परखड भूमिका मांडली होती. ती भूमिका ब्राह्मण समाजाचा द्वेष करणारी असल्याचा आरोप करीत तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकरने इंद्रजीत सावंत यांना फोन कॉल करून धमकी दिली.

कोरटकर हा पोलीस तपासात सहकार्य करीत नसून पोलीस ठाण्यात हजर राहण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. त्याचा तपासावर गंभीर परिणाम होत असल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे. सरकारच्या वतीने ॲड. हितेन वेणेगावकर यांनी सोमवारी न्या. राजेश पाटील यांच्या समोर याचिका निदर्शनास आणून दिली.

अटकेची शक्यता

सरकारने कारवाईत सक्रियता दाखवल्यामुळे कोरटकरच्या अटकेची शक्यता वाढली आहे. कोरटकरने राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

शासकीय जमिनीवरील पात्र घरांना कायदेशीर मान्यता; २०११ पूर्वीच्या पात्र घरांसाठी सुवर्णसंधी; ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Mumbai : पोलिसांची गाडी रोखणाऱ्या 'त्या' तरुणीची सायबर सेलमध्ये धाव; ऑनलाइन छळ, अश्लील ट्रोलिंगविरोधात तक्रार

Thane : सिग्नलवरील प्रतीक्षा अवधी १५ सेकंदांवर येणार; वाहतूक सुधारणा प्रकल्पाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

आता पैशामुळे शस्त्रक्रिया थांबणार नाहीत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

मुंबईत ३३ ठिकाणी फ्लड गेट; पूरस्थितीचा इशारा देणारी सेन्सर यंत्रणा उभारणार; २०२९ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट