मुंबई

हॉटेल पार्टीत तरुणीचा विनयभंग

तरुणीच्या विनयभंगप्रकरणी पळून गेलेल्या दोन्ही आरोपींना वांद्रे युनिटच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. समद रईस खान आणि मोहम्मद आसिफ अब्दुल रशीद खान अशी या दोघांची नावे असून चौकशीसाठी आंबोली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे

Swapnil S

मुंबई : हॉटेल पार्टीत एका तरुणीच्या विनयभंगप्रकरणी पळून गेलेल्या दोन्ही आरोपींना वांद्रे युनिटच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. समद रईस खान आणि मोहम्मद आसिफ अब्दुल रशीद खान अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही पुढील चौकशीसाठी आंबोली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

तक्रारदार तरुणी ही शनिवारी अंधेरीतील एका हॉटेलमध्ये गेली होती. पहाटेपर्यंत रंगलेल्या पार्टीच दोन जण आल्यानंतर त्यापैकी एका तरुणाकडे पिस्तूल होते. याच पिस्तूलचा धाक दाखवून त्याने तिथे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने तक्रारदार तरुणीशी अश्‍लील वर्तन करून तिचा विनयभंग केला होता. या घटनेनंतर तिने आंबोली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी ३४०, ३५४ अ, ५०९, ३४ भादवी सहकलम ३, २५ भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला होता. सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले.

ओला दुष्काळ जाहीर करण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नकार; पण सर्व सवलती लागू, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! क्वेट्टामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, १० ठार, भयानक व्हिडिओ समोर

Dombivali : झोपेतच सर्पदंश! ३ वर्षांच्या चिमुकलीसह मावशीचा मृत्यू; KDMC रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत