मुंबई

वीज कनेक्शनसाठी केला बदल; महावितरणची नवी व्यवस्था

महावितरणकडून मुंबईचा काही भाग वगळता संपूर्ण राज्यात वीजपुरवठा सेवा दिली जाते. ग्राहकांना नव्या वीज कनेक्शनसाठी ऑनलाईन अर्ज करता येतो. अर्जाची तपासणी झाल्यानंतर ग्राहकाला शुल्क भरण्याची सूचना दिली जाते.

Swapnil S

मुंबई : ग्राहकाने अर्ज केल्यानंतर महानगरांमध्ये तीन दिवसांत, शहरांमध्ये सात दिवसांत आणि ग्रामीण भागात १५ दिवसांत नवे वीज कनेक्शन देण्याच्या महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या कालमर्यादेची तंतोतंत अंमलबजावणी करण्यासाठी महावितरणने माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून कार्यपद्धतीत बदल केला आहे. त्यामुळे ग्राहकांना वीज कनेक्शनसाठी वाट पहावी लागणार नाही. महावितरणची ही व्यवस्था गुरुवार, १ जानेवारीपासून सुरू झाली आहे.

महावितरणकडून मुंबईचा काही भाग वगळता संपूर्ण राज्यात वीजपुरवठा सेवा दिली जाते. ग्राहकांना नव्या वीज कनेक्शनसाठी ऑनलाईन अर्ज करता येतो. अर्जाची तपासणी झाल्यानंतर ग्राहकाला शुल्क भरण्याची सूचना दिली जाते.

पायाभूत सुविधांसह ९० दिवसांत जोडणी

नवीन वीज कनेक्शनसाठी अर्ज केल्यानंतर महानगरांसाठी तीन दिवस, शहरांसाठी सात दिवस आणि ग्रामीण भागात १५ दिवसांत कनेक्शन देण्याची तरतूद केली असली तरी ती जेथे पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत, त्यासाठी ही कालमर्यादा आहे. विजेचे खांब उभारून व तारा जोडून वीजपुरवठा उपलब्ध करण्यासाठी ९० दिवस लागणार आहेत.

डेडलाइन संपली! महाराष्ट्रातील २७ लाख वाहनांना अद्यापही HSRP नाही; अंमलबजावणीसाठी RTO सज्ज

बांगलादेशची IPL प्रसारणावर अनिश्चितकालीन बंदी; मुस्तफिजुर रहमानला KKR मधून बाहेर काढल्यामुळे निर्णय

Delhi Riots Case : उमर खालिद, शर्जिल इमामला झटका; जामीन अर्ज SC ने फेटाळला, "एक वर्षानंतर दोघांनाही पुन्हा...

थिएटरमधील महिलांच्या टॉयलेटमध्ये 'हिडन कॅमेरा' आढळल्याने गोंधळ; एकजण पोलिसांच्या ताब्यात, Video व्हायरल

Mumbai : डेटिंग अ‍ॅपवर ओळख, मग व्हिडिओ कॉल, नंतर थेट भेटायला गेला अन्...; पवईत ४० वर्षीय व्यक्तीला आला भयावह अनुभव