मुंबई

अनधिकृत इमारतींत राहणारे नागरिक भीतीच्या सावटाखाली

२०१३मध्ये रोजी मुंब्रा येथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ७६ जणांचा मृत्यू झाला होता.

प्रतिनिधी

अनधिकृत इमारतींत राहणाऱ्‍या नागरिकांनी पावसाळ्यात एकदिवस आपलं घर पत्त्यांप्रमाणे कोसळेल या भीतीच्या सावटाखाली राहू नये. एक सन्मानजनक, प्रतिष्ठित जीवन जगावे, अशी आमची इच्छा आहे, असे स्पष्ट करत मुख्य न्यायमूर्ती दीपाकंर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने ठाण्यातील मुंब्रा येथील नऊ बेकायदेशीर इमारतीत राहणाऱ्या नागरिकांच्या कारवाईला स्थगिती देण्याची विनंती फेटाळून लावली.

२०१३मध्ये रोजी मुंब्रा येथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ७६ जणांचा मृत्यू झाला होता. त्या प्रकरणातील सरकारी साक्षीदार असलेल्या संतोष भोईर यांनी वकील नीता कर्णिक यांच्यामार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुंब्रा येथील नऊ अनधिकृत इमारती पाडण्याची मागणी याचिकेतून केली आहे. ठाणे महानगरपालिकेने (टीएमसी) अनधिकृत बांधकामांना अनेक वेळा पाडण्याच्या नोटीसा बजावल्या आणि इमारतींचा वीज आणि पाणीपुरवठाही खंडित केला तरीही रहिवासी तेथेच अवैधपणे राहत आहेत. या सर्व इमारती जीर्ण असून राहण्यास योग्य नाहीत, असा दावा याचिकेत केला आहे. त्यावर सोमवारी मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. मागील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने इमारतीतील रहिवाशांना सुरक्षिततेच्या कारणास्तव स्वेच्छेने घरे रिकामी करण्याचे निर्देश दिले होते.

प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेचा डोंबिवली स्थानकावर आज आणि उद्या रात्री पॉवर ब्लॉक

आर्थिक मर्यादेमुळे कर्मचाऱ्यांना वर्षानुवर्षे 'हंगामी' ठेवता येणार नाही! उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

Virar News : अश्लील फोटो, ब्लॅकमेल अन् वडिलांचा अपमान; विवा कॉलेजमधील १९ वर्षांच्या विद्यार्थिनीने संपवलं जीवन

भारतात AI हब स्थापन होणार; गुगल करणार १५ अब्ज डॉलरची गुंतवणूक: अदानीच्या सहकार्याने सर्वात मोठे डेटा सेंटर

रमाबाई आंबेडकर नगरवासीयांचे स्वप्न २ वर्षांत होणार पूर्ण! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास