मुंबई

विशिष्ट वर्गाला गुलामगिरीत अडकवून स्वच्छता साध्य करता येत नाही! ५८० कामगारांना कायमस्वरूपी कर्मचारी घोषित करा - हायकोर्टाचे निर्देश

महाराष्ट्रासारख्या कल्याणकारी राज्यात, एका विशिष्ट वर्गाच्या नागरिकांसाठी इतरांना गुलामगिरीत अडकवून स्वच्छता साध्य करता येत नाही, असे स्पष्ट करत मुंबई हायकोर्टाने...

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्रासारख्या कल्याणकारी राज्यात, एका विशिष्ट वर्गाच्या नागरिकांसाठी इतरांना गुलामगिरीत अडकवून स्वच्छता साध्य करता येत नाही, असे स्पष्ट करत मुंबई हायकोर्टाने पालिकेला त्यांच्या ५८० कामगारांना कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून घोषित करण्याचे व त्यांना सर्व लाभ देण्याचे निर्देश दिले.

कचरा वाहतूक श्रमिक संघ या कामगार संघटनेने रस्ते साफ करणाऱ्या, कचरा गोळा करणाऱ्या तसेच त्याची वाहतूक करणाऱ्या ५८० कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम करण्याचे आदेश औद्योगिक न्यायालयाने दिले होते. त्या विरोधात महापालिकेने हायकोर्टात दाद मागत औद्योगिक न्यायालयाचा निर्णय रद्द करावा, अशी विनंती केली होती.

या याचिकेवर न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्यासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने नोव्हेंबर २०२३ मध्ये दिलेल्या निर्णयाची प्रत नुकतीच प्रसिद्ध झाली. न्यायालयाने याचिकेची गंभीर दखल घेतली. “स्वच्छ पर्यावरण हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. असे असले तरी कामगारांच्या मूलभूत हक्क आणि प्रतिष्ठेशी तडजोड होणे योग्य नाही. त्यांचा अधिकारांना डावलता येणार नाही, असे आदेशात स्पष्ट करताना औद्योगिक न्यायालयाचा निकाल रद्द करणे म्हणजे न्यायाची फसवणूक केल्यासारखे होईल, असे मत व्यक्त करत ५८० कामगार गेल्या २५ वर्षांपेक्षा जास्त काळ पालिकेसोबत काम करत आहेत. ही कामे करताना अनेक जण जायबंदी झाले आहेत, आजारी पडले आहेत पण त्यांना कोणतेही लाभ मिळालेले नाहीत. त्यामुळे त्यांना डावलून चालणार नाही,” असे आदेशात स्पष्ट केले.

पॅराग्लायडिंग वर्ल्ड कपचा थरार सुरू; पाचगणीच्या आकाशात देशी-विदेशी पॅराग्लायडर्सची भरारी

Navi Mumbai : उद्या १२ तास पाणीपुरवठा बंद; खारघर आणि तळोजा परिसराला फटका, सिडकोची घोषणा

मीरा-भाईंंदरमध्ये मालमत्ता करात मोठी वाढ; महासभेत ठराव मंजूर; १ एप्रिल २०२६ पासून अंमलबजावणी

Bhiwandi : महापौर निवडणुकीला वेगळे वळण; भाजपने उमेदवार बदलला; नारायण चौधरी सेक्युलर आघाडीकडे

अजित पवार विमान अपघात : ब्लॅकबॉक्समधून डेटा मिळविण्यासाठी भारत घेणार अमेरिकेची मदत