मुंबई

नव्या सरकारच्या स्वागतासाठी मंत्रालयात स्वच्छता मोहीम

राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले असतानाच नवीन सरकारच्या स्वागतासाठी मंत्रालयही सज्ज होऊ लागले आहे.

Swapnil S

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले असतानाच नवीन सरकारच्या स्वागतासाठी मंत्रालयही सज्ज होऊ लागले आहे. मंत्रालयतील जुन्या फायली, जुन्या कागदपत्रांच्या नोंदी तसेच जुनी कपाटे आणि फर्निचर व अन्य वापरात नसलेल्या सामानांची विल्हेवाट लावण्याची मोहीम आजपासूनच हाती घेण्यात येणार आहे.

राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने याबाबत पुढाकार घेतला आहे़ विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आचारसंहिते सुरू असलेल्या काळात ही स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. अनेक फाईली व कागदपत्रांचे संगणकीकरण डिझीटलायझेशन करण्यात आलेले असल्यामुळे या फाईली आता बाद करण्यात येतील. तसेच जुने फर्निचर काढून त्या जागाी नवीन फर्निचर बसवण्यात येणार आहे.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस