मुंबई

नव्या सरकारच्या स्वागतासाठी मंत्रालयात स्वच्छता मोहीम

राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले असतानाच नवीन सरकारच्या स्वागतासाठी मंत्रालयही सज्ज होऊ लागले आहे.

Swapnil S

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले असतानाच नवीन सरकारच्या स्वागतासाठी मंत्रालयही सज्ज होऊ लागले आहे. मंत्रालयतील जुन्या फायली, जुन्या कागदपत्रांच्या नोंदी तसेच जुनी कपाटे आणि फर्निचर व अन्य वापरात नसलेल्या सामानांची विल्हेवाट लावण्याची मोहीम आजपासूनच हाती घेण्यात येणार आहे.

राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने याबाबत पुढाकार घेतला आहे़ विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आचारसंहिते सुरू असलेल्या काळात ही स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. अनेक फाईली व कागदपत्रांचे संगणकीकरण डिझीटलायझेशन करण्यात आलेले असल्यामुळे या फाईली आता बाद करण्यात येतील. तसेच जुने फर्निचर काढून त्या जागाी नवीन फर्निचर बसवण्यात येणार आहे.

Maratha Reservation : मनोज जरांगेंची मोठी घोषणा; मोर्चा मुंबईत धडकणार, जाण्याचा मार्गही ठरला

महाबळेश्वर-पाचगणी परिसरात स्ट्रॉबेरी लागवडीची लगबग सुरू; मजूर टंचाई, वाढती रोजंदारी आणि उत्पादन खर्चामुळे शेतकरी चिंतातूर

इंटरनेटशिवाय UPI पेमेंट? RBI च्या नव्या सुविधेने काय बदलणार? जाणून घ्या सविस्तर

Karjat : लाडक्या बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी; मूर्तीवर शेवटचा हात फिरविण्यात कलाकार मग्न

SRA कडून ४५० हून अधिक निष्क्रिय विकासकांची हकालपट्टी