मुंबई

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा; म्हणाले...

राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मोठा दिलासा देण्यात आला असून मोठी घोषणा केली

प्रतिनिधी

राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनेकदा विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना या प्रश्नावरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. अशामध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी घोषणा केली आहे. या या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकार आता प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान देणार आहे. २०० रुपये अनुदानाची शिफारस करण्यात आली होती, पण आपण ३०० रुपये देण्याचा निर्णय घेतला," अशी घोषणा त्यांनी केली. ते पुढे म्हणाले की, "कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून देशाच्या कांदा उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर आहे. यामध्ये ४३ टक्के वाटा हा आपल्या राज्याचा आहे." अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

ते म्हणाले की, "बाजारामध्ये लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर आहे. देशातील इतर राज्यातील कांद्याचे उत्पादन वाढल्यामुळे पुरवठ्याच्या प्रमाणात मागणी कमी आहे. यामुळे कांद्याच्या दरामध्ये घसरण झाली आहे. त्याला मिळणारा भाव कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील जिव्हाळ्याचा भाग आहे," असे मत त्यांनी व्यक्त केले.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत