संग्रहित छायाचित्र  
मुंबई

कॉलेजियमऐवजी चांगली व्यवस्था शोधावी लागेल; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांचे प्रतिपादन

काही लोक कॉलेजियम पद्धतीला दोष देत असले तरी त्याऐवजी एक चांगली आणि अधिक परिणामकारक पद्धत शोधावी लागेल, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांनी शुक्रवारी सांगितले.

Swapnil S

मुंबई: काही लोक कॉलेजियम पद्धतीला दोष देत असले तरी त्याऐवजी एक चांगली आणि अधिक परिणामकारक पद्धत शोधावी लागेल, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांनी शुक्रवारी सांगितले.

ते म्हणाले की, कोणतीही व्यवस्था परिपूर्ण नसते. सध्याच्या व्यवस्थेनुसार, सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायमूर्तींचे कॉलेजियम उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी केंद्र सरकारला शिफारसी करते.

कोणी म्हणेल की कॉलेजियम व्यवस्था चुकीची आहे, पण मग आपल्याला विद्यमान व्यवस्थेला पर्याय म्हणून एक चांगली व्यवस्था विकसित करावी लागेल," असे ते म्हणाले.

कोणतीही व्यवस्था परिपूर्ण नसते. प्रत्येक व्यवस्थेत काही त्रुटी असतात. न्यायव्यवस्थेतही आहेत, कार्यकारिणीतही आहेत. त्यामुळे चांगली व्यवस्था शोधणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

कॉलेजियमची कार्यपद्धती आणि काही न्यायाधीशांच्या नियुक्तीत झालेल्या विलंबाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले, "विलंब हा कॉलेजियमने शिफारस केल्यानंतर होतो." सरकारला कॉलेजियमकडे शिफारस पुन्हा विचारासाठी परत पाठवण्याचा अधिकार आहे, असे एका निकालात म्हटले आहे, मात्र तो निकाल प्रत्यक्षात अंमलात आणला जात नाही, असेही त्यांनी नमूद केले.

वक्तृत्व आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या मूलभूत अधिकाराबद्दल बोलताना ओक म्हणाले, "कोणत्याही न्यायाधीशाला एखाद्या राजकारण्याने किंवा स्टँड-अप कॉमेडियनने लिहिलेली किंवा बोललेली गोष्ट आवडणार नाही, असे होऊ शकते. पण न्यायाधीश म्हणून माझे कर्तव्य फक्त एवढेच आहे की कायदा किंवा मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाले आहे का, हे पाहणे. मी फक्त कडक निर्णय लिहू शकतो आणि तेथेच माझे कर्तव्य संपते."

माध्यमांकडे जनमत घडवण्याची, बदलण्याची किंवा प्रभावित करण्याची ताकद आहे आणि त्यामुळे ते योग्य-अयोग्याबद्दल भूमिका घेऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले.

पर्यावरण संरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना माजी न्या. ओक म्हणाले की मुंबईत जेव्हा पर्यावरणपूरक निर्णय दिले जातात, तेव्हा राजकारणी न्यायालयावर टीका करतात. "पर्यावरणाशी संबंधित बाबींमध्ये कार्यकारिणी नेहमीच न्यायालयाच्या आदेशांना बगल देण्याचा प्रयत्न करते," असे त्यांनी नमूद केले. माध्यमे आणि न्यायालय या दोघांनीही पर्यावरण रक्षणासाठी पुरेसे केले आहे का, याचा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

समुद्रातील मासेमारीला लहान बोटी मुकणार; शासनाच्या निर्णयाला मच्छीमार कृती समितीचा विरोध

कामगारांच्या कामाचे तास वाढणार नाहीत; कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडून स्पष्टीकरण

मुंबईत घुसले १४ दहशतवादी, ३४ वाहनांमध्ये मानवी बॉम्बस्फोट घडवणार; अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना धमकी

Mumbai : लालबागच्या राजाचे अंतिम दर्शन घ्यायचे आहे? मग 'या' मार्गावर द्या बाप्पाला शेवटचा निरोप!

“शशी थरूर यांना स्पर्धक मिळाला”; पंजाबच्या महापुराबाबत पठ्ठ्याचं तोडकं-मोडकं इंग्रजी ऐकून नेटकरी लोटपोट, Video व्हायरल