मुंबई

खारघर महाराष्ट्र भूषण सोहळा मृत्यूप्रकरणी विशेष अधिवेशन बोलवा; नाना पटोलेंचे राज्यपालांना पत्र

नवशक्ती Web Desk

नवी मुंबईतील खारघरमध्ये ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र, त्यानंतर या सोहळ्यासाठी आलेल्या श्री सदस्यांना उष्माघाताचा त्रास सहन करायला लागला. एवढेच नव्हे तर यामुळे १४ श्री सदस्यांना मृत्यूने गाठले. यावरून आता राज्याचे राजकारण चांगलेच तापले असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपाल रमेश बैस यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी या प्रकरणावर विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी केली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पत्रात म्हणाले की, "कोटी रुपये या सोहळ्यासाठी खर्च करुनही लाखो श्री सदस्यांना रखरखत्या उन्हात तासंतास बसावे लागले. त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये, म्हणून साधे छत लावण्याची तसदी राज्य सरकारने घेतली नाही. त्यांना पिण्याचे पाणीही मिळू शकले नसल्याने उष्माघातामुळे अनेक श्री सदस्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. तसेच, यावेळी चेंगराचेंगरी झाल्याच्या बातम्याही अनेक प्रसार माध्यमातून येत असून हा प्रकार अत्यंत गंभीर आहे." अशा भावना त्यांनी यामध्ये व्यक्त केल्या आहेत.

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग

मुंबई: धरणांतील जलसाठा घटला; १५ जुलैपर्यंत तहान भागेल इतकाच पाणीसाठा

World Bee Day 2024: जागतिक मधमाशी दिन,का साजरा केला जातो हा दिवस? जाणून घ्या महत्त्व

आम्ही भाजप मुख्यालयात येतो, अटक कराच! अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आ‌व्हान

Marathi Serial: लोकप्रिय मालिका 'बाळुमामाच्या नावानं चांगभलं' प्रेक्षकांपुढे येणार नवीन अवतारात!