मुंबई

खारघर महाराष्ट्र भूषण सोहळा मृत्यूप्रकरणी विशेष अधिवेशन बोलवा; नाना पटोलेंचे राज्यपालांना पत्र

महाराष्ट्र भूषण सोहळ्यानंतर आता काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राज्यपालांना पत्र लिहीत यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली

नवशक्ती Web Desk

नवी मुंबईतील खारघरमध्ये ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र, त्यानंतर या सोहळ्यासाठी आलेल्या श्री सदस्यांना उष्माघाताचा त्रास सहन करायला लागला. एवढेच नव्हे तर यामुळे १४ श्री सदस्यांना मृत्यूने गाठले. यावरून आता राज्याचे राजकारण चांगलेच तापले असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपाल रमेश बैस यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी या प्रकरणावर विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी केली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पत्रात म्हणाले की, "कोटी रुपये या सोहळ्यासाठी खर्च करुनही लाखो श्री सदस्यांना रखरखत्या उन्हात तासंतास बसावे लागले. त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये, म्हणून साधे छत लावण्याची तसदी राज्य सरकारने घेतली नाही. त्यांना पिण्याचे पाणीही मिळू शकले नसल्याने उष्माघातामुळे अनेक श्री सदस्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. तसेच, यावेळी चेंगराचेंगरी झाल्याच्या बातम्याही अनेक प्रसार माध्यमातून येत असून हा प्रकार अत्यंत गंभीर आहे." अशा भावना त्यांनी यामध्ये व्यक्त केल्या आहेत.

Mumbai : ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा अन् नववर्षाचा जल्लोष; मुंबई, ठाणे, डोंबिवलीत गुढीपाडव्याच्या भव्य शोभायात्रा

Air Travel Alert : प्रवाशांनो लक्ष द्या! 'या' ४ विमानतळांवर बंदी; फ्लाइट्सवर होणार परिणाम

अक्षय्य तृतीयेपूर्वी सोन्याचे दर वाढण्याची शक्यता; ग्राहकांच्या खरेदी धोरणावर परिणाम होणार

Nagpur : मॅट्रिमोनियल साईटवरील ओळख महागात पडली; मॉर्फ अश्लील व्हिडिओने ३६ वर्षीय व्यक्तीला ब्लॅकमेल

भिवंडीत फर्निचर मार्केटला भीषण आग; अनेक दुकाने जळून खाक, सुदैवाने जीवितहानी टळली