मुंबई

महानगरपालिकेच्या उद्यान विभागामार्फत जैवविविधतेचे संवर्धन

प्रतिनिधी

महानगरपालिकेच्या उद्यान विभागामार्फत त्यांच्या अखत्यारित असलेल्या भूखंडावर नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवताना जैवविविधतेचे संवर्धन होईल, अशा प्रकारे शहरातील विविध उद्यानांचा विकास, त्यामध्ये राबवलेल्या वेगवेगळ्या संकल्पना जसे की सुगंधी उद्यान, पाम उद्यान, गुलाब उद्यान, मीयावकी पद्धतीचे उद्यान, अशा अनेक नावीन्यपूर्ण योजना उद्यान विभाग राबवत आहे.

महानगरपालिकेच्या २४ प्रभागांमध्ये रोपवाटिका असून त्यामध्ये वेगवेगळ्या तसेच दुर्मीळ प्रजातींच्या वृक्षांचे जतन व संवर्धन केले जाते. परिणामी, मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरातही आपल्याला सहज जैवविविधतेचे दर्शन घडते. विविध प्रजातींची रंगबिरंगी फुलपाखरे, अनेक प्रकारचे कीटक, विविध प्रजातीच्या पक्ष्यांचा वावर आपणास कुठल्याही उद्यानात फेरफटका मारल्यास सहज दृष्टीस पडतो, अशी माहिती उद्यान विभागप्रमुख, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली. मानवी हस्तक्षेपामुळे या धरतीवरील जैवविविधता धोक्यात आली आहे. तिचे संवर्धन व जतन करणे आवश्यक आहे, याबाबत विश्वामध्ये जागृतता निर्माण करण्याचे हेतूने २२ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन म्हणून साजरा केला जातो. बृहन्मुंबई महानगरपालिकेचा उद्यान विभाग हा नेहमीच जैवविविधतेच्या संवर्धनासाठी अग्रेसर असतो.

Maharashtra Rain : महाराष्ट्राला पावसाचा तडाखा; ८३ लाख एकरपेक्षा जास्त पिकांचे नुकसान

मराठवाडा पूरग्रस्तांसाठी लालबागचा राजा मंडळाची मदत; पारलिंगी समुदायाने मागितला जोगवा, राज्यातील शिक्षकांचाही पुढाकार

शाहरुख खान लेकामुळे पुन्हा अडचणीत! समीर वानखेडेंची न्यायालयात धाव, २ कोटींचा मानहानीचा दावा

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी निर्दोष मुक्ततेनंतर लष्करात पुन्हा स्थान; प्रसाद पुरोहित यांची कर्नल पदी बढती

पुन्हा उभं राहण्याची आशा संपली! धाराशिवमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या; अतिवृष्टीने शेत गेलं वाहून