मुंबई

आरोपींना न्यायालयाचे समन्स ;२५ सप्टेंबरला हजर राहण्याचे आदेश मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण

न्यायलयाने सर्व आरोपीना समन्स बजावले आहे

नवशक्ती Web Desk

मुंबई : मालेगाव २००८ बॉम्बस्फोट खटला अंतिम टप्प्यात आला असून, सर्व साक्षीदाराच्या साक्षी नोंदविण्याचे काम पूर्ण झाले. याची दाखल घेत मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयएचे न्यायाधीश ए.के. लाहोटी यांनी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह सर्व आरोपीना समन्स बजावून २५ सप्टेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

२९ सप्टेंबर २००८ मालेगावमधील एका मशिदीत बॉम्बस्फोट झाला होता. यात ७ जणांना आपले प्राण गमवावे लागले. याप्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर द्विवेदी, अजय राहिरकर यांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी अनेकजण सध्या जामीनावर बाहेर आहेत.

साक्षी नोंदवण्याचे काम पूर्ण

मुंबईतील विशेष एनआयएचे न्यायाधीश ए.के लाहोटी यांच्यासमोर हा खटला नियमित सुरू आहे. साक्षीदाराच्या साक्षी नोंदवण्याचे काम पूर्ण झाले. त्यानंतर आरोपींचा फौजदारी दंड संहितेच्या कलम ३१३ अन्वये जबाब नोंदविण्यासाठी तसेच खटल्यातील पुराव्यांवर म्हणणे मांडण्याची आरोपींना संधी मिळावी म्हणून न्यायलयाने सर्व आरोपीना समन्स बजावले आहे.

"पहिली अन् शेवटची चूक"; पंतप्रधान मोदींना शिवीगाळ करणाऱ्या मुलीने मागितली माफी, म्हणाली - "मी फक्त १५...

Mumbai : स्टेशन मास्तरांवर आणखी एक जबाबदारी! आता भटक्या कुत्र्यांवरही ठेवावी लागणार नजर

Thane : पॉड टॅक्सीचा 'तांत्रिक' अडथळा महिनाभरात दूर होणार; व्यवहार्यता अहवालासाठी स्वतंत्र सल्लागार संस्था; आयुक्त सौरभ राव यांचे आश्वासन

Mumbai : उंच गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी समुद्रात जागा द्या; गणेशोत्सव समन्वय समितीची सरकारकडे मागणी

झोपडपट्टी पुनर्वसन धोरणात होणार बदल; SRA च्या अधिनियमाचे कार्याभिमुख लेखापरीक्षण; अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती