मुंबई

आरोपींना न्यायालयाचे समन्स ;२५ सप्टेंबरला हजर राहण्याचे आदेश मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण

न्यायलयाने सर्व आरोपीना समन्स बजावले आहे

नवशक्ती Web Desk

मुंबई : मालेगाव २००८ बॉम्बस्फोट खटला अंतिम टप्प्यात आला असून, सर्व साक्षीदाराच्या साक्षी नोंदविण्याचे काम पूर्ण झाले. याची दाखल घेत मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयएचे न्यायाधीश ए.के. लाहोटी यांनी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह सर्व आरोपीना समन्स बजावून २५ सप्टेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

२९ सप्टेंबर २००८ मालेगावमधील एका मशिदीत बॉम्बस्फोट झाला होता. यात ७ जणांना आपले प्राण गमवावे लागले. याप्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर द्विवेदी, अजय राहिरकर यांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी अनेकजण सध्या जामीनावर बाहेर आहेत.

साक्षी नोंदवण्याचे काम पूर्ण

मुंबईतील विशेष एनआयएचे न्यायाधीश ए.के लाहोटी यांच्यासमोर हा खटला नियमित सुरू आहे. साक्षीदाराच्या साक्षी नोंदवण्याचे काम पूर्ण झाले. त्यानंतर आरोपींचा फौजदारी दंड संहितेच्या कलम ३१३ अन्वये जबाब नोंदविण्यासाठी तसेच खटल्यातील पुराव्यांवर म्हणणे मांडण्याची आरोपींना संधी मिळावी म्हणून न्यायलयाने सर्व आरोपीना समन्स बजावले आहे.

"बिनशर्त माफी मागा"; बिहारचे CM नितीश कुमार यांनी महिला डॉक्टरचा हिजाब ओढल्याच्या प्रकारावर जावेद अख्तरांचा संताप

मुंबई उच्च न्यायालयाला बॉम्बची धमकी; २ तास कामकाज ठप्प, सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश; म्हणाल्या - 'राजीव सातव यांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि देवाभाऊंच्या...

पापा...पापा...; शहीद जवानाचं पार्थिव अन् दीड वर्षांची चिमुकली... काळजाचं पाणी करणारा Video व्हायरल

"साखरेच्या सुरीने मित्रपक्षाचा गळा...मी केलेलं भाकित सत्यात उतरतंय"; प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशावर रोहित पवारांची टीका