मुंबई

१४० कोटी भारतीयांचा अपेक्षाभंग; ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा अजिंक्य

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताचा डाव ५० षटकांत २३० धावांत संपुष्टात आला

नवशक्ती Web Desk

अहमदाबाद : संपूर्ण स्पर्धेत वर्चस्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाने एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत दारुण पराभव पत्करला. सलग १० सामने जिंकूनही अंतिम लढतीतील पराभवाने भारतीय संघाचे मूसळ केरात गेले. ट्रेव्हिस हेडच्या १३७ धावांच्या शतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने भारताला ६ गडी राखून धूळ चारत तब्बल सहाव्यांदा विश्वचषक उंचावला. त्यामुळे १४० कोटी भारतीयांचा अपेक्षाभंग झाला.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताचा डाव ५० षटकांत २३० धावांत संपुष्टात आला. मग ऑस्ट्रेलियाने ४३ षटकांत हे लक्ष्य गाठले. त्यामुळे १९८३ व २०११नंतर तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्यात भारताला अपयश आले. पराभवानंतर भारतीय खेळाडू तसेच मैदानातील पाठिराख्यांना अश्रूंना आवर घालणे कठीण गेले.

Mumbai : अधिवेशनादरम्यान विधानभवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क

ठाणे होणार कचरामुक्त; पहिला प्रकल्प गायमुख येथे; १०० मेट्रीक टन ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती

LPG ग्राहकांनो लक्ष द्या! e-KYC अनिवार्य; मोबाईलवर काही मिनिटांत पूर्ण करा ही प्रक्रिया

Thane : व्यावसायिक गॅस सिलिंडरचा काळाबाजार; हॉटेल व्यावसायिकांची कारवाईची मागणी

श्रीरामपूरमधील जमीन मंत्र्याच्या घशात घालण्याचा डाव! काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांचा आरोप