मुंबई

१४० कोटी भारतीयांचा अपेक्षाभंग; ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा अजिंक्य

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताचा डाव ५० षटकांत २३० धावांत संपुष्टात आला

नवशक्ती Web Desk

अहमदाबाद : संपूर्ण स्पर्धेत वर्चस्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाने एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत दारुण पराभव पत्करला. सलग १० सामने जिंकूनही अंतिम लढतीतील पराभवाने भारतीय संघाचे मूसळ केरात गेले. ट्रेव्हिस हेडच्या १३७ धावांच्या शतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने भारताला ६ गडी राखून धूळ चारत तब्बल सहाव्यांदा विश्वचषक उंचावला. त्यामुळे १४० कोटी भारतीयांचा अपेक्षाभंग झाला.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताचा डाव ५० षटकांत २३० धावांत संपुष्टात आला. मग ऑस्ट्रेलियाने ४३ षटकांत हे लक्ष्य गाठले. त्यामुळे १९८३ व २०११नंतर तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्यात भारताला अपयश आले. पराभवानंतर भारतीय खेळाडू तसेच मैदानातील पाठिराख्यांना अश्रूंना आवर घालणे कठीण गेले.

'कॉकरोच कभी डरते नहीं…'; अभिजीत दिपके यांची जंतर-मंतरवर घोषणाबाजी, NEET पेपरफुटीवरून शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

Raigad : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रायगडावर जल्लोष; फुलांनी सजला गड, हजारो शिवभक्तांची उपस्थिती

फेरीवाल्यांबाबत भाजपमध्ये दुमत; ओळखपत्र देण्यास भाजप नगरसेवकाचाच विरोध; स्थायी समितीत राष्ट्रीय सुरक्षेचा तेजिंदर तिवाना यांनी दिला हवाला

Mumbai : ७ जूनपासून पाणीटंचाईची शक्यता; वॉटर टँकर असोसिएशनकडून बेमुदत संपाचा इशारा

एकतर्फी प्रेमाचा हैवानपणा! १७ वर्षीय मुलीवर कुऱ्हाडीचे वार, गळ्यात फास बांधून छतावर लटकवण्याचा प्रयत्न, VIDEO