मुंबई

१४० कोटी भारतीयांचा अपेक्षाभंग; ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा अजिंक्य

नवशक्ती Web Desk

अहमदाबाद : संपूर्ण स्पर्धेत वर्चस्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाने एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत दारुण पराभव पत्करला. सलग १० सामने जिंकूनही अंतिम लढतीतील पराभवाने भारतीय संघाचे मूसळ केरात गेले. ट्रेव्हिस हेडच्या १३७ धावांच्या शतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने भारताला ६ गडी राखून धूळ चारत तब्बल सहाव्यांदा विश्वचषक उंचावला. त्यामुळे १४० कोटी भारतीयांचा अपेक्षाभंग झाला.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताचा डाव ५० षटकांत २३० धावांत संपुष्टात आला. मग ऑस्ट्रेलियाने ४३ षटकांत हे लक्ष्य गाठले. त्यामुळे १९८३ व २०११नंतर तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्यात भारताला अपयश आले. पराभवानंतर भारतीय खेळाडू तसेच मैदानातील पाठिराख्यांना अश्रूंना आवर घालणे कठीण गेले.

Pune Porsche crash: "पोलिसांवर दबाव आणला नाही, मी पहिल्यापासून ‘नाईट लाईफ’च्या विरोधात"; राष्ट्रवादीच्या आमदाराचं स्पष्टीकरण

Maharashtra HSC 12th Result 2024: यंदाही मुलींचीच बाजी; कोकण विभाग अव्वल तर 'या' विभागाचा सर्वात कमी निकाल!

Mumbai: फ्लेमिंगोंच्या थव्याला विमानाची धडक, घाटकोपर परिसरात ३७ पक्ष्यांचा मृत्यू

Maharashtra HSC 12th Result: बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे करा अभिनंदन, पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश!

KKR vs SRH: पावसामुळे सामना रद्द झाल्यास 'हा' संघ थेट फायनलमध्ये; आज ठरणार अंतिम फेरीचा पहिला मानकरी