मुंबई

उद्धव ठाकरेंसोबतचे अनेक लोकप्रतिनिधी आमच्याकडे येणार; मला म्हाडा अध्यक्षपद फडणवीसांनी दिले -उदय सामंत

कोकण दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी उदय सामंत यांच्यावर टीका केली होती. उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

Swapnil S

प्रतिनिधी/मुंबई : मला म्हाडाचे अध्यक्षपद देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. शिवसेनेत असताना मी मंत्री निश्चितच झालो. पण तेव्हाही माझे नाव कापण्याचे प्रयत्न सुरू होते. तेव्हा सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांनी माझे मंत्रिपद त्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न केल्यानेच मला मंत्रिपदाची शपथ घेता आली. उद्धव ठाकरे आताच कोकण दौरा करून गेले. पण या दौऱ्यात त्यांच्याच व्यासपीठावर जे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी बसले होते त्यातील अनेक जण आमच्याकडे येणार आहेत. लवकरच त्यांचे पक्षप्रवेश होतील, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली.

कोकण दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी उदय सामंत यांच्यावर टीका केली होती. उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे आमच्या कौटुंबिक व्यवसायांवर टीका करतात. आम्ही गद्दार असल्याचे म्हणतात. पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे काँग्रेससोबत कधीच जायचे नाही या मताचे होते. ज्या पक्षासोबत युती करून जनमत मिळविले त्याला सोडून काँग्रेससोबत तर आम्ही गेलो नाही. उलट भाजपसोबतच जाऊन सरकार स्थापन केले. जनमताचाच आदर आम्ही केला. व्यवसाय करूनच गाड्या घेतो. कोणतेही व्यवसाय वा उद्योगधंदे न करता सहा मजल्यांचे घर कोणी बांधले, असा प्रश्न मात्र मी कधीच विचारणार नाही, असे उदय सामंत म्हणाले.

ओला दुष्काळ जाहीर करण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नकार; पण सर्व सवलती लागू, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! क्वेट्टामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, १० ठार, भयानक व्हिडिओ समोर

Dombivali : झोपेतच सर्पदंश! ३ वर्षांच्या चिमुकलीसह मावशीचा मृत्यू; KDMC रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत