नागपुरात १२ वीचा केमिस्ट्री पेपर लीक! विद्यार्थिनीच्या वारंवार वॉशरूमला जाण्यामुळे आली शंका; मोबाईलमध्ये सापडला पुरावा

नागपुरात १२ वीचा केमिस्ट्री पेपर लीक! विद्यार्थिनीच्या वारंवार वॉशरूमला जाण्यामुळे आली शंका; मोबाईलमध्ये सापडला पुरावा

नागपुरात बारावीच्या केमिस्ट्री विषयाची प्रश्नपत्रिका व्हॉट्सॲपवर लीक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून, विद्यार्थिनीचा मोबाईल जप्त करण्यात आला, अशी माहिती मिळाली. परीक्षा सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका आणि संभाव्य उत्तरे सोशल मीडियावर फिरत असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
Published on

नागपुरात बारावीच्या केमिस्ट्री विषयाची प्रश्नपत्रिका व्हॉट्सॲपवर लीक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून, विद्यार्थिनीचा मोबाईल जप्त करण्यात आला, अशी माहिती मिळाली. परीक्षा सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका आणि संभाव्य उत्तरे सोशल मीडियावर फिरत असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.

नेमके काय घडले?

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, बुधवारी एका परीक्षा केंद्रावर १२ वीची केमिस्ट्रीची लेखी परीक्षा सुरू असताना एका विद्यार्थिनीवर पर्यवेक्षकांना संशय आला. ती वारंवार स्वच्छतागृहात जात असल्याने तिची तपासणी करण्यात आली, त्यावेळी तिच्याकडून मोबाइल फोन जप्त करण्यात आला. मोबाईल तपासल्यावर समोर आले की, एका व्हॉट्सॲप ग्रुपवर परीक्षा सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका आणि संभाव्य उत्तरे शेअर केली गेली होती.

विद्यार्थिनीच्या निवेदनानुसार आणखी काही विद्यार्थ्यांची चौकशी सुरू झाली आहे. प्राथमिक तपासात एका खाजगी कोचिंग क्लासशी संबंधित व्यक्तीने पैशाच्या मोबदल्यात पेपर लीक केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिस या आर्थिक देवाणघेवाणीचे धागेदोरे तपासत आहेत.

गुन्हा नोंद आणि डिजिटल तपास

सदर प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून व्हॉट्सॲप ग्रुप, मोबाईल फोन आणि डिजिटल पुरावे तपासले जात आहेत. पोलिसांचा सखोल तपास सुरू असून, पेपर नेमका कुठून लीक झाला आणि यात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध घेतला जात आहे.

नागपुरात १२ वीचा केमिस्ट्री पेपर लीक! विद्यार्थिनीच्या वारंवार वॉशरूमला जाण्यामुळे आली शंका; मोबाईलमध्ये सापडला पुरावा
दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी, तर दहावीची २० फेब्रुवारीपासून

पालक आणि विद्यार्थी प्रतिक्रिया

परीक्षेदरम्यान अशा प्रकारचे गैरवर्तन उघडकीस आल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. शैक्षणिक अधिकाऱ्यांनी नियम पाळण्याचे आणि परीक्षा केंद्रात नीतीमान वर्तणूक राखण्याचे आवाहन केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in