मुंबई

मान्सूनचा निरोप; हवामान खात्याची घोषणा

प्रतिनिधी

गेले चार महिने सतत बरसणाऱ्या नैऋत्य मोसमी पावसाने २३ ऑक्टोबरला आपला मुक्काम देशातून हलवला आहे, अशी घोषणा भारतीय हवामान खात्याने केली. दरवर्षी तो ८ ऑक्टोबर रोजी देशातून जात असतो. यंदा तो जास्त रेंगाळला. येते दोन दिवस शहरात आकाश निरभ्र राहणार आहे. मुंबई हवामान खात्याचे प्रमुख जयंत सरकार म्हणाले की,नैऋत्य मोसमी पावसाने मुंबईतून नव्हे, तर देशातून ‘एक्झिट’ घेतली आहे. २३ ऑक्टोबर रोजी तो आपल्या देशातून परतला आहे.

देशाच्या विविध भागातून परतीचा पाऊस सुरू झाला होता. मात्र, ऑक्टोबरमध्ये मुंबई व परिसरात जोरदार पाऊस झाला. कोकण व गोव्यात मुसळधार पाऊस झाला होता. आता हे पाऊस वाहून नेणारे वारे महासागराच्या दिशेने गेले आहेत. त्यामुळे मान्सून परतला आहे.

यंदा ऑक्टोबरमध्ये २२६.३ मिमी पाऊस पडला आहे. गेल्या वर्षी ९१ मिमी पाऊस पडला होता. गेल्या वर्षी पाऊस १४ ऑक्टोबर रोजी परतला होता.

पश्चिम महाराष्ट्रात कोणाचा गुलाल? मतदारांमध्ये उत्सुकता, मुद्यांवरून गुद्यांवर चर्चा

"अपना टाईम भी आयेगा" म्हणत बिचुकलेंनी सांगितले कल्याण मतदारसंघ निवडण्याचे कारण

Youtuber Elvish Yadav: एल्विश यादवला आणखीन एक झटका, मनी लॉन्ड्रिंगचा खटला दाखल, ED करणार चौकशी!

दोन्ही हात नसतानाही मिळवलं ड्रायव्हिंग लायसन्स, तमिळनाडूच्या तरूणानं कशी साधली किमया?

काय सांगता! Bajajनं आणली चक्क CNG BIKE, 'या' दिवशी होणार लॉन्च