मुंबई

रेल्वेत नोकरी देण्याच्या आमिषाने पाच बेरोजगारांची फसवणूक

नवशक्ती Web Desk

मुंबई : रेल्वेत ट्रकमन व गॅगमन पदावर नोकरी देण्याच्या आमिषाने पाच बेरोजगार तरुणांची फसवणूक केल्याप्रकरणी राकेश बापू जाधव या भामट्याविरुद्ध बोरिवली पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. फसवणूक झालेले पाचही तरुण नाशिकचे रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सागितले. ३४ वर्षांचे तक्रारदार शेतकरी असून, ते मूळचे नाशिकचे रहिवाशी आहे. पाच वर्षांपूर्वी त्यांचा भाऊ व इतर नातेवाईक बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात न्यायालयीन सुनावणीसाठी आले होते. तिथेच त्यांची राकेश जाधवशी ओळख झाली होती. त्याने त्यांना तो कस्टममध्ये कामाला असून, त्याची रेल्वेमध्ये ओळख असल्याचे सांगितले होते. यावेळी त्यांनी रेल्वेची परिक्षा दिली होती, मात्र त्यांची निवड झाली नसल्याचे त्याला सांगितले होते. यावेळी त्याने त्यांच्या भावासह इतर चार नातेवाईकांना रेल्वेमध्ये ट्रकमन आणि गॅगमन पदावर नोकरी देण्याचे आश्‍वासन दिले होते. या कामासाठी त्याने त्यांच्याकडे सात लाखांची मागणी केली होती. भारतीय रेल्वेत नोकरी मिळत असल्याने त्यांनी त्यास होकार दिला होता. त्यानंतर त्यांनी त्याला नोकरीसाठी सव्वातीन लाख रुपये दिले होते.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त