मुंबई

फनेल झोनमुळे रखडलेल्या इमारतींचा पुनर्विकास होणार

मुंबई विमानतळाच्या इमारतींचा बाजूच्या अनेक पुनर्विकास रखडला होता. त्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी राज्य शासनाने तयार केलेल्या नवीन योजनेची महत्त्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत केली. या योजनेमुळे मुंबईतील हजारो पुनर्विकास प्रकल्प मार्गी लागणार आहेत.

Swapnil S

मुंबई : मुंबई विमानतळाच्या इमारतींचा बाजूच्या अनेक पुनर्विकास रखडला होता. त्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी राज्य शासनाने तयार केलेल्या नवीन योजनेची महत्त्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत केली. या योजनेमुळे मुंबईतील हजारो पुनर्विकास प्रकल्प मार्गी लागणार आहेत.

मुंबई विमानतळाच्या बाजूला असलेल्या इमारतींचा फनेल झोन व इतर तांत्रिक अडथळ्यांमुळे अनेक इमारतींचा पुनर्विकास शक्य होत नव्हता. त्यामुळे संपूर्ण चटई क्षेत्र वापरात येत नव्हते, ही अडचण दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'सर्वांसाठी घरे' धोरणांतर्गत राज्य शासनाने ही नवी योजना तयार केली आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. या योजनेत जमीन मालकांना त्यांच्या मूळ मालकी हक्काच्या प्रमाणात बेसिक चटई क्षेत्र देण्यात येणार आहे. संरक्षित भाडेकरूंना त्यांच्या संरक्षित क्षेत्राएवढा किंवा किमान ३० चौ. मीटर चटई क्षेत्र देण्यात येईल. तसेच अधिकृत रहिवाशांनाही त्यांच्या कायदेशीर ताब्यातील क्षेत्राएवढा किंवा किमान ३० चौ. मीटर क्षेत्रफळाइतका यापैकी जो अधिक असेल तो एफएसआय मिळेल.

या योजनेअंतर्गत न वापरलेले चटई क्षेत्र हे टीडीआर स्वरूपात उपलब्ध करून दिले जाईल. त्यामुळे प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य होतील. तसेच विद्यमान विकास नियंत्रण नियम ३३(७) व ३३ (९) अंतर्गत मिळणारे सर्व इनसेंटिव्ह, प्रीमियम व इतर फायदे कायम राहणार असल्याचे सांगून या नव्या योजनेमुळे मुंबई क्षेत्रातील फनेल झोन बाधित पुनर्विकास प्रकल्पांना मोठा दिलासा मिळणार आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

दुर्बल घटकांना मोफत घर

या योजनेत मुंबईतील सर्व पुनर्विकासयोग्य इमारतींच्या पुनर्विकासाला चालना देण्यात येणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ३०० चौ. फुटापर्यंतचे चटई क्षेत्र मोफत देण्यात येणार आहे. तसेच अल्प उत्पन्न गटासाठी ६०० चौ. फुटापर्यंतच्या सदनिकांची पुनर्बाधणी विनाशुल्क व्हावी, यासाठी विशेष तरतूद केली.

धरणे भरली, मात्र घागर रिकामीच! जलउद्वाहन केंद्रांतील गाळामुळे ठाण्याचा पाणीपुरवठा विस्कळीत; कळवा, मुंब्रा, घोडबंदरसह अनेक भागांत कमी दाबाने पाणी

पोलीस बंदोबस्तात KDMC रुग्णालयांतील सेवा पूर्ववत; डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी उपाययोजनांचे आश्वासन

ठाणे कोस्टल रोडच्या कामाला वेग; चौदा महिन्यांत ७५ टक्के पायाभरणी पूर्ण

सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला शिवसेना ठाकरे गटाचा पाठिंबा

Satara : महाबळेश्वरमध्ये पर्यटकाची हत्या; चारही आरोपींना अटक