मुंबई

मुंबईत २७ ते २९ एप्रिलदरम्यान उष्णतेची लाट, हवामान खात्याचा इशारा; 'असा' बचाव करा

गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या झळांनी सर्वसामान्य माणूस कातावलेला असतानाच २७ ते २९ एप्रिलदरम्यान उष्णतेची लाट मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यात येणार आहे...

Swapnil S

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या झळांनी सर्वसामान्य माणूस कातावलेला असतानाच २७ ते २९ एप्रिलदरम्यान उष्णतेची लाट मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यात येणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे. यामुळे मुंबईकरांनी सकाळी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांत चक्रीय वातविरोधी स्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे २७ ते २९ एप्रिलदरम्यान तापमानात वाढ होऊ शकते, असे हवामान शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी सांगितले.

सध्या एप्रिल महिन्यातच सूर्य आग ओकत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील तीन जिल्ह्यांना पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला. सकाळी ९ ते १० वाजताच दुपारी १२ वाजल्यासारख्या उन्हाचा तडाखा जाणवत आहे. लोकलमध्ये बसणेही अवघड बनले आहे. घरात व घराबाहेर पडल्यानंतर घामाच्या धारा वाहत आहेत. नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईत यापूर्वी १५ व १६ एप्रिलला तापमान वाढ झाली होती. त्यावेळी अनेक ठिकाणी ४१ अंश तापमान झाले होते.

उष्णतेपासून असा बचाव करा

हवामान विभागाने नागरिकांना दीर्घकाळ उन्हात राहू नये. पुरेसे पाणी प्या, सूती कपडे वापरण्याचा सल्ला दिला आहे. दुपारच्या वेळी घराबाहेर पडताना चेहरा झाकून घ्या. टोपी घाला, छत्री वापरा, असा सल्ला दिला आहे.

आता जनगणना 'तुमच्या' हातात! देशात पहिल्यांदाच डिजिटल जनगणना; मोबाईलवरच माहिती भरण्याची नवी सुविधा

वसई-विरारमध्ये पाणीटंचाईचा इशारा! ४ एप्रिलपासून आठवडाभर पाणीपुरवठा विस्कळीत; कोणत्या भागात कधी पाणी बंद? जाणून घ्या

पुण्यात अवकाळी पावसाचा कहर! रस्ते जलमय, वाहनं अडकली; Video व्हायरल

मुंबईकरांसाठी खुशखबर! बोरीवली-ठाणे प्रवास फक्त १५ मिनिटांत, बोगद्याच्या कामाला सुरुवात

AAPचा मोठा निर्णय! खासदार राघव चढ्ढा यांना राज्यसभेतील उपनेतेपदावरून हटवले; भाषणावरही बंदी, नेमकं कारण काय?