संग्रहित छायाचित्र 
मुंबई

१२ जूननंतर कोसळधारा

मेमध्ये दमदार हजेरी लावल्यानंतर गायब झालेला मान्सून आता १२ जूननंतर सक्रिय होणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला.

Swapnil S

मुंबई : मेमध्ये दमदार हजेरी लावल्यानंतर गायब झालेला मान्सून आता १२ जूननंतर सक्रिय होणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला.

राज्यात वादळी वाऱ्यासह आणि मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडेल. राज्यात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, नाशिक, जळगाव, बुलढाणा, धाराशिव, सोलापूर, अहमदनगर, धुळे आणि जालना जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला. १३ ते १८ जून या कालावधीत राज्यातील बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी पावसाळ्याच्या तयारीसाठी सज्ज राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, १९ ते २६ जून या आठवड्यात विदर्भात पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी योग्य वेळ आणि हवामानाचा अंदाज घेऊन पुढील नियोजन करावे. त्यामुळे शेतीच्या कामांना गती मिळेल आणि नुकसान टाळता येईल.

ठाणे होणार कचरामुक्त; पहिला प्रकल्प गायमुख येथे; १०० मेट्रीक टन ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती

श्रीरामपूरमधील जमीन मंत्र्याच्या घशात घालण्याचा डाव! काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांचा आरोप

Mumbai : पालिका मुख्यालयातील उपहारगृहाचा गॅससाठा संपला; रोजच्या १५०० लोकांच्या जेवणाचे वांदे

Thane : व्यावसायिक गॅस सिलिंडरचा काळाबाजार; हॉटेल व्यावसायिकांची कारवाईची मागणी

खटला सुरू नसताना आरोपीला बेमुदत काळासाठा डांबता येणार नाही! सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा