Heavy rains in Mumbai, ANI
मुंबई

Mumbai Rains: मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल ट्रेन, बसवर परिणाम

Tejashree Gaikwad

IMD Weather Update: मुंबईत रविवारी मुसळधार पाऊस झाला. बीएमसीकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, अवघ्या १० तासांत १०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याने मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी २४ जुलैपर्यंत यलो अलर्ट जारी केला आहे, तर रायगडमध्ये मंगळवारपर्यंत ऑरेंज अलर्ट कायम राहणार आहे. या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला हाय अलर्ट राहण्याचे निर्देश दिले आहेत. रविवारी धो धो कोसळल्यावर आता सोमवारी सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरु आहे.

आयएमडीच्या अंदाजानुसार, पुढील ३-४ तासांत मुंबई जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

लोकल ट्रेनचे अपडेट्स

पश्चिम रेल्वेच्या मुंबई गाड्यांबद्दलच्या ताज्या अपडेटनुसार, 'गाड्या वेळेवर धावत आहेत.'

तसेच हार्बर मार्गावरच्या ट्रेनही वेळेवर धावत आहेत.

आज सकाळी कल्याण स्थानकात सिग्नल बिघडल्याने मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांना मोठा विलंब झाला. पहाटे झालेल्या या व्यत्ययामुळे गर्दीच्या वेळेत गाड्या वेळापत्रकाच्या मागे धावत होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि एक-ए वरील सिग्नलवर पाणी साचल्याने सिग्नल बिघाड झाला. ही समस्या सकाळी ७.३० च्या सुमारास नोंदवली गेली आणि मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी हि समस्या ८.४० पर्यंत दुरुस्त केली.

मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरुवातीला कल्याणहून निघणाऱ्या केवळ चार गाड्यांना सिग्नल बिघडल्याने त्याचा थेट परिणाम झाला. तथापि, प्रवाशांनी इतर अनेक रेल्वे सेवांवर कॅस्केडिंग प्रभावांचा हवाला देत नेटवर्कवर व्यापक विलंब झाल्याची तक्रार केली. ही घटना पावसाळ्यात रेल्वे नेटवर्कसमोरील आव्हाने अधोरेखित करते, जेथे पायाभूत सुविधांच्या असुरक्षिततेमुळे सेवेत व्यत्यय येऊ शकतो. रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रवाशांना आश्वासन दिले आहे की भविष्यात अशा घटना कमी करण्यासाठी पावले उचलली जात आहेत आणि प्रतिकूल हवामान असतानाही सुरळीत कामकाज सुनिश्चित केले जात आहे.

Jammu Kashmir Election : नंदनवनात आज अखेर मतदान; २४ जागांसाठी २१९ उमेदवार रिंगणात

One Nation, One Election ची अंमलबजावणी कधी? केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मोठे विधान

सुप्रीम कोर्टाने रोखला 'बुलडोझर न्याय'! आमच्या परवानगीशिवाय एकही पाडकाम नको; पुढील सुनावणीपर्यंत आदेश

सगेसोयरे अधिसूचनेवर सरकारनियुक्त समित्यांचे काम सुरू; कोणत्याही समाजाची फसवणूक करणार नाही - मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीची आचार संहिता कधी लागू होणार? गिरिश महाजनांनी वर्तवले भाकीत