मुंबई

कांदा खरेदी केंद्रांची संख्या वाढवा मुख्यमंत्री शिंदे यांचे केंद्र सरकारला पत्र

नाफेडच्या १३ खरेदी केंद्रांवर कांदा खरेदी केला जात आहे

प्रतिनिधी

मुंबई : केंद्र सरकारने नाफेडमार्फत कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यात नाफेडने कांदा खरेदी सुरू केली आहे. सध्या नाफेडच्या १३ खरेदी केंद्रांवर कांदा खरेदी केला जात आहे, मात्र ही खरेदी केंद्र अपुरी पडत आहे. त्यामुळे राज्यात कांदा खरेदी केंद्रांची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय कृषी मंत्री आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री यांना पत्र लिहून केली आहे.

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उमटले. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड संतप्त आहे. शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने राज्यातील २ लाख मेट्रिक टन कांदा प्रति क्विंटल २ हजार ४१० रुपये दराने खरेदी करण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार नाफेडमार्फत राज्यात ही खरेदी सुरू झाली आहे. गुरुवारपर्यंत राज्यातील १३ कांदा खरेदी केंद्रांवर ५०० मेट्रिक टन कांदा खरेदी झाला आहे. २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करायचा असल्याने या वेगाने कांदा खरेदी लवकर पूर्ण होणार नाही. तसेच खरेदी केंद्र कमी असल्याने या केंद्रांवर कांदा विक्रीसाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागत आहेत. त्यामुळे कांदा खरेदी केंद्र वाढवावी, अशी विनंती मुख्यमंत्री शिंदे यांनी या पत्राद्वारे केंद्र सरकारकडे केली आहे. कांद्याच्या प्रश्नावर राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, अशी ग्वाहीही शिंदे यांनी दिली आहे.

न्यूयॉर्कच्या लागार्डिया विमानतळावर भीषण अपघात! Air Canada Express विमानाची फायर ट्रकला धडक; दोघांचा मृत्यू, अनेकजण जखमी, VIDEO

Mumbai : भटक्या कुत्र्यांचा उपद्रव कायम; २५ हजारांवर कुत्र्यांचे निर्बीजीकरण; तरीही त्रास सुरूच

कच्च्या तेलाच्या आयातीचा खर्च वाढणार; इथेनॉल उद्योग २० टक्के मिश्रण पुरवण्यास सज्ज

दक्षिण मुंबईतील शौचालय प्रकल्प संशयाच्या भोवऱ्यात; महापालिका अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात

उदयोन्मुख अर्थव्यवस्थांसाठी भारत मार्गदर्शक बनणार; केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे प्रतिपादन