मुंबई

कांदा खरेदी केंद्रांची संख्या वाढवा मुख्यमंत्री शिंदे यांचे केंद्र सरकारला पत्र

नाफेडच्या १३ खरेदी केंद्रांवर कांदा खरेदी केला जात आहे

प्रतिनिधी

मुंबई : केंद्र सरकारने नाफेडमार्फत कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यात नाफेडने कांदा खरेदी सुरू केली आहे. सध्या नाफेडच्या १३ खरेदी केंद्रांवर कांदा खरेदी केला जात आहे, मात्र ही खरेदी केंद्र अपुरी पडत आहे. त्यामुळे राज्यात कांदा खरेदी केंद्रांची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय कृषी मंत्री आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री यांना पत्र लिहून केली आहे.

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उमटले. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड संतप्त आहे. शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने राज्यातील २ लाख मेट्रिक टन कांदा प्रति क्विंटल २ हजार ४१० रुपये दराने खरेदी करण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार नाफेडमार्फत राज्यात ही खरेदी सुरू झाली आहे. गुरुवारपर्यंत राज्यातील १३ कांदा खरेदी केंद्रांवर ५०० मेट्रिक टन कांदा खरेदी झाला आहे. २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करायचा असल्याने या वेगाने कांदा खरेदी लवकर पूर्ण होणार नाही. तसेच खरेदी केंद्र कमी असल्याने या केंद्रांवर कांदा विक्रीसाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागत आहेत. त्यामुळे कांदा खरेदी केंद्र वाढवावी, अशी विनंती मुख्यमंत्री शिंदे यांनी या पत्राद्वारे केंद्र सरकारकडे केली आहे. कांद्याच्या प्रश्नावर राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, अशी ग्वाहीही शिंदे यांनी दिली आहे.

पालिका निवडणुकांचे बिगुल वाजले! २९ महापालिकांचा महासंग्राम १५ जानेवारीला, १६ जानेवारीला मतमोजणी; आचारसंहिता लागू

पुण्यात भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

महालक्ष्मी रेसकोर्सवर होणार सेंट्रल पार्क; आचारसंहिता लागू होण्याआधीच उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून घोषणांचा पाऊस

म्हाडा वसाहतींच्या सामूहिक पुनर्विकासाला गती; २० एकरवरील प्रकल्पांसाठी नवीन धोरण जाहीर

केंद्राच्या ‘मनरेगा’तून महात्मा गांधी बाहेर; आता योजनेचे नवे नाव ‘विकसित भारत-जी- राम-जी २०२५’