साखर गोड नाही, 'स्मार्ट' व्हायला हवी; भारतीय अन्न उद्योगाला आवाहन 
मुंबई

साखर गोड नाही, 'स्मार्ट' व्हायला हवी; भारतीय अन्न उद्योगाला आवाहन

भारतात दरवर्षी लाखो नागरिक मधुमेह आणि लठ्ठपणाच्या विळख्यात सापडत असताना, साखर कपात हा विषय आता केवळ आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. तो एक बहुआयामी वैज्ञानिक, तांत्रिक, नियामक आणि व्यावसायिक प्रश्न बनला असून त्यावर ठोस, समन्वित उत्तर शोधण्यासाठी देशातील अन्न शास्त्रज्ञ, नियामक संस्था आणि उद्योग क्षेत्र मुंबईत एकत्र आले.

Swapnil S

मुंबई : भारतात दरवर्षी लाखो नागरिक मधुमेह आणि लठ्ठपणाच्या विळख्यात सापडत असताना, साखर कपात हा विषय आता केवळ आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. तो एक बहुआयामी वैज्ञानिक, तांत्रिक, नियामक आणि व्यावसायिक प्रश्न बनला असून त्यावर ठोस, समन्वित उत्तर शोधण्यासाठी देशातील अन्न शास्त्रज्ञ, नियामक संस्था आणि उद्योग क्षेत्र मुंबईत एकत्र आले.

असोसिएशन ऑफ फूड सायंटिस्ट्स अँड टेक्नॉलॉजिस्ट्स- इंडिया मुंबई चॅप्टरने सीएसआयआर- केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्थाच्या सहयोगाने बुधवारी मुंबईतील सीप्झ येथील भारत रत्नम सभागृहात "चिनी कम २०२६- साखर कपातीवरील भागधारक परिषद" आयोजित केली. अन्न व पेय निर्मितीतील साखर कपातीचे तांत्रिक दृष्टिकोन या विषयावरील या एकदिवसीय परिषदेत ज्येष्ठ शास्त्रज्ञ, नियामक अधिकारी, बहुराष्ट्रीय अन्न कंपन्या आणि आरोग्यदायी खाद्यपदार्थ क्षेत्रातील स्टार्टअप्स एकत्र आले. चव, पोत आणि व्यावसायिक व्यवहार्यता न गमावता भारताच्या अन्नपुरवठ्यातून साखर कमी करण्याचा व्यावहारिक मार्ग आखणे हे या परिषदेचे मुख्य उद्दिष्ट होते.

Mumbai : एचपीव्ही लसीकरणामुळे गर्भाशय कर्करोगावर नियंत्रण; केईएम रुग्णालयात २८२ लाभार्थ्यांना एचपीव्हीची मात्रा

NEET UG 2026 Re-Exam : फ्लश टँकमध्ये मोबाईल लपवून परीक्षेत कॉपीचा प्रयत्न; १८ वर्षीय विद्यार्थ्याला अटक

NEET Paper Leak : लातूरच्या 'क्लास बाजारा'ला फटका; सोशल मीडियातील अफवा पडल्या भारी

Mumbai Rain : मेघगर्जनेसह पावसाचे जोरदार पुनरागमन! वांद्रे-वरळीसह अनेक भागांत मुसळधार सरी, ऑरेंज अलर्ट जारी

Mumbai BEST Strike : अखेर तोडगा निघाला! राज्य सरकारसोबतच्या चर्चेनंतर बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; बससेवा टप्प्याटप्प्याने पूर्ववत