मुंबई

पाच सत्रांमध्ये गुंतवणूकदारांचे १४.६० लाख कोटींचे नुकसान

सलग पाचव्या दिवशी बुधवारी सेन्सेक्स ५२२.८२ अंकांनी म्हणजेच ०.८१ टक्क्यानी घसरून ६४,०४९.०६ वर बंद झाला

नवशक्ती Web Desk

मुंबई : मध्य पूर्वेत सध्या सुरू असलेल्या तणावामुळे गुंतवणूकदारांवरील दबावामुळे भारतीय शेअर बाजारात सलग पाचव्या दिवशी बुधवारी पाच शतकी घसरण झाली. मुंबई शेअर बाजारातील पाच सत्रातील घसरणीत गुंतवणूकदारांचे १४.६० लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. पाच दिवसांत बीएसई सेन्सेक्स २,३७९.०३ अंकांनी म्हणजेच ३.५८ टक्क्यांनी घसरला आहे. बीएसई-सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल पाच दिवसांत १४,६०,२८८.८२ कोटी रुपयांनी घसरून ३,०९,२२,१३६.३१ कोटी रुपये झाले. सलग पाचव्या दिवशी बुधवारी सेन्सेक्स ५२२.८२ अंकांनी म्हणजेच ०.८१ टक्क्यानी घसरून ६४,०४९.०६ वर बंद झाला. दिवसभरात तो ६४ हजारांखाली गेला. अशाच प्रकारे एनएसई निफ्टी १५९.६० अंकांनी किंवा ०.८३ टक्क्यानी घसरून १९,१२२.१५ वर बंद झाला.

Mumbai : अनधिकृत फेरीवाल्यांची तक्रार आता व्हॉट्सॲपवर; BMC ची नवी सुविधा सुरू

NEET UG 2026 Re-Exam : परीक्षेसाठी रेल्वेचा मोठा निर्णय; २१ जूनचा मेगाब्लॉक रद्द

Mumbai : पावसाळ्यासाठी पश्चिम रेल्वे सज्ज; ट्रॅक सर्किट बिघाड रोखण्यासाठी विशेष उपाययोजना

NEET पुनर्परीक्षा होईपर्यंत Telegram वर बंदी; केंद्राच्या निर्णयाविरोधात कंपनीची दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल

'पास करून देतो' म्हणत विद्यार्थिनींशी गैरवर्तन; संतप्त पालकांकडून शिक्षकाला चोप