मुंबई

पाच सत्रांमध्ये गुंतवणूकदारांचे १४.६० लाख कोटींचे नुकसान

सलग पाचव्या दिवशी बुधवारी सेन्सेक्स ५२२.८२ अंकांनी म्हणजेच ०.८१ टक्क्यानी घसरून ६४,०४९.०६ वर बंद झाला

नवशक्ती Web Desk

मुंबई : मध्य पूर्वेत सध्या सुरू असलेल्या तणावामुळे गुंतवणूकदारांवरील दबावामुळे भारतीय शेअर बाजारात सलग पाचव्या दिवशी बुधवारी पाच शतकी घसरण झाली. मुंबई शेअर बाजारातील पाच सत्रातील घसरणीत गुंतवणूकदारांचे १४.६० लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. पाच दिवसांत बीएसई सेन्सेक्स २,३७९.०३ अंकांनी म्हणजेच ३.५८ टक्क्यांनी घसरला आहे. बीएसई-सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल पाच दिवसांत १४,६०,२८८.८२ कोटी रुपयांनी घसरून ३,०९,२२,१३६.३१ कोटी रुपये झाले. सलग पाचव्या दिवशी बुधवारी सेन्सेक्स ५२२.८२ अंकांनी म्हणजेच ०.८१ टक्क्यानी घसरून ६४,०४९.०६ वर बंद झाला. दिवसभरात तो ६४ हजारांखाली गेला. अशाच प्रकारे एनएसई निफ्टी १५९.६० अंकांनी किंवा ०.८३ टक्क्यानी घसरून १९,१२२.१५ वर बंद झाला.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक